शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

"संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असं वाटणारे ठार वेडे"

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 09:59 IST

Shiv Sena Attack on BJP : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले आणि जनतेने ते स्वीकारले संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेतओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत

मुंबई - एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना आणि भाजपा आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आमनेसामने आले आहेत. औरंगाबादच्या नामांतराच्या शिवसेनेने तयार केलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता भाजपाच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, जेव्हा अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे अब्दुल कलाम असे नामांतर केले. तेव्हाच महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? हे भाजपाने सांगावे असा सवाल सामनामधील अग्रलेखामधून करण्यात आला आहे.सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही जुनाच आहे. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी संबंध जोडणे मुर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसले तरी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले आणि जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील आदी लोकांनी केला आहे. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी असा भाजपाचा आग्रह आहे. पण त्यात भूमिका स्पष्ट करण्यासारखे काय आहे. शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते. हे नामांतर लोकांनी स्वीकारले आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्येही लवकच दुरुस्ती होईल. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत अशतील तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.आता भाजपाच्या थयथयाटाबाबत बोलायचे तर अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्ग असे नामांतर होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मात्र ही नामांतरे केली तेव्हाच औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही. तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवले, असा प्रतिसवाल शिवसेनेने विचारला आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिर सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्याबाबतीतही तसाच निर्णय होईल, असा विश्वास शिवसेनेने या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. एमआयएमचा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत, हे ढोंग आहे. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.बाकी बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे आणि सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातूर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सूरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइचा फुगा फोडता येईल का ते पाहावे, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण