शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

"संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असं वाटणारे ठार वेडे"

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 09:59 IST

Shiv Sena Attack on BJP : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले आणि जनतेने ते स्वीकारले संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेतओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत

मुंबई - एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना आणि भाजपा आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आमनेसामने आले आहेत. औरंगाबादच्या नामांतराच्या शिवसेनेने तयार केलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता भाजपाच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, जेव्हा अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे अब्दुल कलाम असे नामांतर केले. तेव्हाच महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? हे भाजपाने सांगावे असा सवाल सामनामधील अग्रलेखामधून करण्यात आला आहे.सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही जुनाच आहे. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी संबंध जोडणे मुर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसले तरी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले आणि जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील आदी लोकांनी केला आहे. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी असा भाजपाचा आग्रह आहे. पण त्यात भूमिका स्पष्ट करण्यासारखे काय आहे. शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते. हे नामांतर लोकांनी स्वीकारले आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्येही लवकच दुरुस्ती होईल. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत अशतील तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.आता भाजपाच्या थयथयाटाबाबत बोलायचे तर अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्ग असे नामांतर होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मात्र ही नामांतरे केली तेव्हाच औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही. तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवले, असा प्रतिसवाल शिवसेनेने विचारला आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिर सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्याबाबतीतही तसाच निर्णय होईल, असा विश्वास शिवसेनेने या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. एमआयएमचा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत, हे ढोंग आहे. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.बाकी बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे आणि सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातूर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सूरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइचा फुगा फोडता येईल का ते पाहावे, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण