शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:29 IST

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

ठळक मुद्देज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेतसरकारने लोकांना दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेतकेंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं

मुंबई – सध्या राज्यात कोरोनाचा काळ आहे, अशावेळी गर्दी करणे, लोकांना एकत्र करणं योग्य नाही, मी बाहेर पडलो, लोकं जमा होतील, म्हणून जास्तीत जास्त काळजी घेतो, जे शासकीय पदावर आहेत त्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहेच, कारण त्यांना शासकीय अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं, मी गेलो तर फक्त आमचे कार्यकर्ते येणार, लोकं गोळा होणार म्हणून मी बाहेर जाणं टाळतो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी केली.

तसेच बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांची नोंदणी सरकारनं करणे गरजेचे आहे, मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधला. सरकारला या गोष्टी निदर्शनास आणूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने ज्या गोष्टी करायला हव्यात त्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही. ज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, पक्ष म्हणून माझ्या पद्धतीने आम्ही हे काम सुरु आहे, पण सरकारनेही काही योजना करायला हव्यात असंही राज ठाकरेंनी सांगितले.

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत, अनेक जणांना मी फोन करुन स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या असं सूचना करत असतो, मध्यंतरी एका औषधासंदर्भात मी राजेश टोपेंशी बोललो तर त्यांनी सांगितले ते मागवता येत नाही, केंद्राने तसे निर्देश दिले आहेत, केंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं, तुम्ही जास्त काळ लॉकडाऊनमध्ये लोकांना ठेवता येणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaj Thackerayराज ठाकरेState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे