शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:29 IST

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

ठळक मुद्देज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेतसरकारने लोकांना दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेतकेंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं

मुंबई – सध्या राज्यात कोरोनाचा काळ आहे, अशावेळी गर्दी करणे, लोकांना एकत्र करणं योग्य नाही, मी बाहेर पडलो, लोकं जमा होतील, म्हणून जास्तीत जास्त काळजी घेतो, जे शासकीय पदावर आहेत त्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहेच, कारण त्यांना शासकीय अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं, मी गेलो तर फक्त आमचे कार्यकर्ते येणार, लोकं गोळा होणार म्हणून मी बाहेर जाणं टाळतो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी केली.

तसेच बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांची नोंदणी सरकारनं करणे गरजेचे आहे, मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधला. सरकारला या गोष्टी निदर्शनास आणूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने ज्या गोष्टी करायला हव्यात त्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही. ज्या कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत त्याठिकाणी मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, पक्ष म्हणून माझ्या पद्धतीने आम्ही हे काम सुरु आहे, पण सरकारनेही काही योजना करायला हव्यात असंही राज ठाकरेंनी सांगितले.

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत, अनेक जणांना मी फोन करुन स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या असं सूचना करत असतो, मध्यंतरी एका औषधासंदर्भात मी राजेश टोपेंशी बोललो तर त्यांनी सांगितले ते मागवता येत नाही, केंद्राने तसे निर्देश दिले आहेत, केंद्र राज्याकडे बोट दाखवतं तर राज्य केंद्राकडे बोट दाखवतं, तुम्ही जास्त काळ लॉकडाऊनमध्ये लोकांना ठेवता येणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaj Thackerayराज ठाकरेState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे