शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले; सरड्याला लाज वाटेल इतके रंग बदलले”

By प्रविण मरगळे | Updated: February 9, 2021 13:06 IST

Shiv Sena MP Arvind Sawant Criticized BJP Amit Shah & Narayan Rane: शिवसेनेला अनेक आव्हानं, आक्रमणं मिळाली, पण ज्यांनी आव्हानं दिली तेच संपले, शिवसेना आहे तिथेच आहे

ठळक मुद्देकलमाडींनी खंडाळ्याच्या घाटापुढे येऊ देणार नाही असं आव्हान शिवसेनेला दिलं होतं, आज शिवसेना दिल्लीपर्यंत पोहचली आहेपत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत ५०-५० टक्के सत्तावाटप करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं? आम्ही कोणतंही वचन दिलं नव्हतं हे सांगायला अमित शहांना सव्वा वर्ष लागलं...तुम्ही वचन दिलं नव्हतं तर सत्तासंघर्षावेळी महाराष्ट्र सोडून हरियाणात का गेलात?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली, त्यावरून शिवसेना-भाजपा यांच्यात पुन्हा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. अमित शहांचे विधान यावर्षीचं सर्वात विनोदी आणि हास्यंस्पद आहे, शिवसेनेला आव्हान देणारे स्वत:चं संपले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला आणि अमित शहांना लगावला आहे.

शहांवर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही कोणतंही वचन दिलं नव्हतं हे सांगायला अमित शहांना सव्वा वर्ष लागलं...तुम्ही वचन दिलं नव्हतं तर सत्तासंघर्षावेळी महाराष्ट्र सोडून हरियाणात का गेलात? ठाकरे घराणं आणि शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे..बंद खोलीनंतर खाली आल्यावर अमित शहा गेले, तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितले होते, पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत ५०-५० टक्के सत्तावाटप करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं? शिवसेनेची शिडी वापरून भाजपा महाराष्ट्रात उभी राहिली. शिडी नाही म्हणूनच आता भाजपा सत्तेतून बाहेर गेली असं त्यांनी सांगितले. (Shiv Sena Arvind Sawant Statement on BJP Amit Shah)

“शिवसेना आमचं जुनं प्रेम"; Valentine Day साठी नितेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गिफ्ट

तर शिवसेना संपली असती हे अमित शहांचे विधान विनोद आणि हास्यस्पद आहे. शिवसेनेला अनेक आव्हानं, आक्रमणं मिळाली, पण ज्यांनी आव्हानं दिली तेच संपले, शिवसेना आहे तिथेच आहे. कलमाडींनी खंडाळ्याच्या घाटापुढे येऊ देणार नाही असं आव्हान शिवसेनेला दिलं होतं, आज शिवसेना दिल्लीपर्यंत पोहचली आहे. शिवसेना एक विचार आहे. ती संपणार नाही. त्यामुळे अशा शापांना आम्हा दाद देत नाही असंही अरविंद सावंत यांनी बजावलं.

दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले

नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत, जिथे सत्ता तिथे ते..हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली, त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, तसेच त्यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते त्यांनाही विचारायला हवं होतं की राणेंबद्दल सभागृहात काय म्हटलं होतं? नारायण राणे यांनी भाजपाला गुंडाचा पक्ष आहे असा आरोप केला होता. त्याचं उत्तर देताना नारायण राणे कसे गुंड आहेत ते फडणवीसांनी सभागृहात सांगितले..त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले. केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतलं तरी काय फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल, धमक्या देऊन माणसांना पक्षात घ्यायचं हेच भाजपाचं काम आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपावर केला आहे.   

भाजपानेही यू टर्न घेतला

कृषी कायद्यावरून पंतप्रधानांनी विरोधकांना यू टर्न घेतल्याचं म्हटलं पण ज्यावेळी मागील सरकार काळात हे विधेयक आलं तेव्हा भाजपा नेत्यांनीही विरोध केला होता, सुषमा स्वराज यांनी तर अडत्यांची बाजू घेतली होती, म्हणजे विरोधात असताना विरोध करायचं आणि सत्तेत आल्यानंतर तो कायदा आणायचं असं भाजपाचं धोरण आहे. भाजपाने यू टर्न घेऊनच कृषी कायदा आणला. आंदोलनजीवी म्हणणाऱ्यांनी सत्तेत नसताना जे आंदोलन केले ते आठवावं, म्हणजे रथयात्रा, महागाईसाठी आंदोलन केले, मग भाजपाही आंदोलनजीवी झाली ना, त्याच आंदोलनातून तुम्ही आज सत्तेत आला ना..असा टोला अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर लगावला आहे.

एका कॉलला किती अंतर आहे?

सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवा, चर्चेला या असं आवाहन केले, मग एका कॉलला किती अंतर आहे..३ महिन्यापासून शेतकरी तिथे आंदोलनाला बसला आहे. मग पंतप्रधानांना एक कॉल शेतकऱ्यांना करण्यास काय हरकत आहे..सभागृहातून आवाहन करतायेत एक कॉल करून शेतकरी नेत्यांना बोलवा, चर्चा करा...काय मागण्या आहेत ते समजून घ्या...थेट त्यांना कॉल करून बोलावून घ्या असं शिवसेनेने म्हटलं आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Amit Shahअमित शहा