शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 19:46 IST

Shiv Sena 55th Vardhapan Din: शिवसेनेवर संकुचितपणाचे आरोप झाले तरी शिवसेना लढत राहिली. गेली ५५ वर्ष शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चालली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ठळक मुद्देसंकटाला घाबरणारा शिवसैनिक नाही. आत्मविश्वास आणि स्वबळ शिवसेनेकडे आहे. हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही, हिंदुत्व आमच्या ह्दयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे.कोरोनाच्या संकटकाळात राजकारण चाललं आहे त्याला विकृतीकरण म्हणतात.

मुंबई – कोरोनाच्या काळात अनेक राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही स्वबळाचा नारा देऊ. पण स्वबळ म्हणजे नेमकं काय? स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास असायलाच आहे. आत्मबळ आणि स्वबळ शिवसेनेने दिलं. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी मराठी माणसाला अपमानित होऊन जीवन जगायला लागत होतं. जर शिवसेनेची स्थापना झाली नसती तर मराठी माणसाची काय अवहेलना झाली असती याचा विचार करा. निवडणुकीपुरतं स्वबळ नाही. न्यायहक्क मिळवण्यासाठी, अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं स्वबळ हवं. अन्यायाविरोधात वार करण्याची ताकद  हवी. तलवार उचलण्याची ताकद नाही तर स्वबळ म्हटलं जातं. आधी तलवार उचलण्याची ताकद कमवा मग वार करा. निवडणुका येतात आणि जातात. हारजीत होत राहते पण आत्मविश्वास हवा. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मनातून खचून जाऊ नका. मनातून खचला तर ते स्वबळ कसलं? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला आहे.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संकटाला घाबरणारा शिवसैनिक नाही. आत्मविश्वास आणि स्वबळ शिवसेनेकडे आहे. अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी स्वबळाचा हक्क आणि अधिकार शिवसेनेकडे आहे. ते फक्त निवडणुकीपुरतं नाही. शिवसेनेवर संकुचितपणाचे आरोप झाले तरी शिवसेना लढत राहिली. गेली ५५ वर्ष शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चालली आहे. या अनुभवातून शिवसेना पुढे चालली आहे. फेसबुकच्या माध्यमातून कोरोनासाठी माहिती देणं हा भाग वेगळा आहे. भाषण करणं हा विचित्र अनुभव आहे. भाषण करताना समोर जल्लोष पाहिजे. रखरखते शिवसैनिक, घोषणा टाळ्या नसतील तर भाषणात मज्जा येत नाही. एकतर्फी बोलतोय त्यामुळे काय बोलावं हे ठरलेलं नाही. जे आहे ते बोलत चाललोय असं त्यांनी सांगितले.

हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही

हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही, हिंदुत्व आमच्या ह्दयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. युती करून आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडलं असं होत नाही. राज्याचा विकास करणं आणि गोरगरिबांना न्याय देणे यासाठी आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं असा अर्थ होत नाही. राजकारण आता बदलत चाललं आहे. कोरोनाच्या संकटकाळात राजकारण चाललं आहे त्याला विकृतीकरण म्हणतात. सत्ता पाहिजे म्हणून हे चाललं असेल तर सत्ता घ्यावी. माझ्यासाठी सत्तास्थापना महत्त्वाची नाही. पण आव्हान आलं ते स्वीकारलं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला काढला आहे.

शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं नाही

तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून हे साध्य झालं. तुम्ही नसता तर मला एक पाऊलही पुढे जाता आला नसतं. रात्री अपरात्री कोणाचा फोन आला तरी धस्स होतं, प्रशासकीय काम आणि शिवसैनिकांची मेहनत यामुळे दुसऱ्या लाटेवर आपण यश मिळवलं आहे. शिवसेनाप्रमुखांचे भाषण व्हायरल होत आहे. समोरचा फटकन् आवाज आला तर आपला ताडकन् आवाज आला पाहिजे. शिवसेनेची ओळख ही रक्तपात करणारी नाही तर रक्तदान करणारी आहे. आरोप करणाऱ्यांची काय ओळख आहे? रक्तसाठा कमी होत चालला आहे असं आवाहन केल्यानंतर शिवसैनिक हजारो बाटल्या रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवले. रक्ताच्या बाटल्या देताना ते रक्त कोणाला जातंय हे विचारत नाही. आमचं रक्तदान हे सर्वांसाठी आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक मदतीला धावतात. बदनामी करणारे बदनामी करत राहतील. आरोप करणारे कोण आहेत? तुझं चारित्र्य स्वच्छ आहे का? आरोप करणारे आरोप करून पळून जातात. आम्ही आमच्या रुबाबात चाललो आहेत. शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं असतं तर ती अजिबात टिकली नसती. शिवसेना कशाच्या जोरावर टीकली असेल तर शिवसेनाप्रमुखांच्या विचारावर पुढे जात चालली आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

निवडणूक आणि सत्ताप्राप्ती विचार बाजूला ठेवा

कोरोनाचा सामना आपण करतोय, किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड १९ आणि पोस्ट कोविड आजार आढळतात. सध्या या कोरोनाच्या संकटात एकहाती सत्ता आणू असं म्हटल्यावर लोकं जोड्याने हाणतील. सत्ता हवी आहे त्याचा उपयोग जनतेसाठी काय होणार हे ठरवण्याची वेळ आली आहे. निवडणुका एके निवडणुका, सत्ताप्राप्ती हा विचार बाजूला ठेऊन कोरोना आणि आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार झाला पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसHindutvaहिंदुत्व