शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

...तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे का?; भाजपाच्या 'घंटानाद'वर शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 07:26 IST

मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही.

ठळक मुद्देज्या ‘मनःशांती’चा उद्घोष विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजेदोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असतेलाखो कुटुंबांचे अर्थकारण चालावे म्हणून मंदिरे उघडायला हवीत. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही

मुंबई - लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय? धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाच्या घंटानाद आंदोलनावर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे! सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही असा घणाघातही शिवसेनेने विरोधी पक्षावर केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

भाजपाच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. तिकडे संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील मियांनी दोन सप्टेंबरनंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बांग दिली म्हणून भाजप पुढाऱ्य़ांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता ‘घंटा’ वाजवणे हे बरे नाही.

मुळात सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली? देवांना बंदिवान का व्हावे लागले? याचा सारासार विचार करून याप्रश्नी विरोधकांनी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे. जेथे जेथे शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडली तेथे कोरोनाचे संक्रमण वाढले हे सत्य आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात याचा फटका बसलाच आहे. प्रत्यक्ष राममंदिर भूमिपूजन सोहोळ्यानंतर मुख्य महंतांसह अनेकांना लागण झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कोरोनाच्या विळख्यात सापडले व त्यांच्यावर पांढऱ्य़ा कपड्यांतील देवदूत उपचाराची शर्थ करीत आहेत. इस्पितळं, कोविड सेंटर्स, आरोग्य यंत्रणा सध्या देवाचे काम करीत आहेत.

गर्दी व त्यातून वाढणारा संसर्ग टाळण्यासाठीच मंदिराचे दरवाजे बंद आहेत, पण इस्पितळांत गर्दी आहे. मंदिर हे  प्रार्थनेचे स्थळ आहे. तेथे मानसिक आधार, मनःशांती मिळते म्हणून मंदिरांची कुलुपे उघडा अशी विरोधी पक्षांची मागणी आहे, पण मंदिरे तसेच इतर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे ही अर्थकारणाची, उपजीविकेची साधने आहेत व लाखो कुटुंबांच्या पोटापाण्याची ही ‘रचना’ देवादिकांनीच केली आहे.

सिद्धिविनायक, तुळजापूर, महालक्ष्मी, शिर्डी, माहुर, भद्रा मारुती, अष्टविनायक, शनिशिंगणापूर, शेगावचे गजानन महाराज ही महत्त्वाची मंदिरे म्हणजे धर्म व पर्यटनाचा पवित्र संगम आहे. मंदिराबाहेरचे अनेक पूजा सामान, खण, नारळ, ओटी, हार-फुले, प्रसादाची दुकाने लाखो कुटुंबांची चूल पेटवत आहेत.

वारकरी संप्रदायाचे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार देशभरात फिरून आध्यात्मिक संवाद साधतात. त्यांच्या सोबत मृदंग, तबलजी, पेटीवालेसुद्धा त्याच आधाराने उपजीविकेचे साधन म्हणून अध्यात्माचे दूत म्हणून काम करतात व त्यात काहीच चुकीचे नाही. त्यामुळे फक्त मनःशांतीच नव्हे, तर लाखो कुटुंबांचे अर्थकारण चालावे म्हणून मंदिरे उघडायला हवीत. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

कोरोनामुळे अमरनाथ, वैष्णोदेवीची यात्रा झाली नाही. त्याचा आर्थिक फटका कश्मीर खोऱ्य़ातील असंख्य कुटुंबांना बसलाच आहे. दुसरे असे की, मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही.

लालबागचा राजाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही, पण आरोग्य महायज्ञ करून नवी परंपरा सुरू केली. लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी

ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधनादेखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय?

दोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असते, तर अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो. क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना फासावर जाण्यापूर्वी मनःशांती प्राप्त झाली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पाच तोफांचे आवाज ऐकून कमालीची मनःशांती मिळाली होती. मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यातही असते. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर