शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शिवसेना खासदारांत अस्वस्थता, की षडयंत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:35 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते.

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याचाइन्कार केला असून आमच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.भाजपा-शिवसेना युतीची शक्यता दुरावत चालल्यामुळे दोन्ही पक्षात अस्वस्थता आहे. विशेषत: दोन्ही पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार युतीसाठी आग्रही आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे १८ तर भाजपाचे २४ खासदार निवडून आले. युती झाली नाही, तर ही संख्या कमी होईल, अशी भीती काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत.शिवाजीराव आढळराव पाटील (शिरुर), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद) आणि अमरावतीचे आनंदराव अडसूळ हे तीन सेना खासदार युतीसाठी आग्रही आहेत. ‘मातोश्री’वर जाऊन ते आपली भूमिका मांडणार होते. त्यासाठी ते आणखी काही खासदारांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्याआधीच ‘बातमी’ फुटल्याने प्रयत्न फसला, अशी चर्चा आहे.मात्र स्वत: खैरे आणि पाटील यांनी याचा इन्कार केला आहे. खा.पाटील म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराने अशी मागणी केली नाही. युती व्हावी ही आमची इच्छा आहे. युती झाल्यास उत्तमच होईल, धावपळ कमी होईल. परंतु, या बाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याची कोणाचीही हिंमत नाही. उद्धवजी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे खा. खैरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>युती व्हावी असे आम्हाला वाटते, पण समजा नाही झाली तरी आम्ही लढू आणि जिंकूदेखील. युतीसाठी आम्ही पक्षनेतृत्वावर कोणताही दबाव वगैरे आणलेला नाही. उद्धवजींवर आम्ही दबाव कसा आणणार? ते आमचे नेते आहेत.- खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव