शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

By प्रविण मरगळे | Updated: November 19, 2020 10:53 IST

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

ठळक मुद्देराजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतातया लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतातआमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे.

मुंबई – राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र भाजपाच्या रणनीतीवर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे. मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा घाट भाजपाचा आहे. मुंबईला वेगळं करण्याचं राजकारण भाजपाचा आहे. मुंबई पोलिसांना माफिया बोलली, मुंबईला पीओके म्हंटली, ती नटी भाजपाची कार्यकर्तीच आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत मराठी माणसाने ज्याच्यामुळे आत्महत्या केली, त्या अँकरसाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना मराठी माणूस धडा शिकवेल. आम्ही सगळे अन्वय नाईक यांच्यामागे उभे आहोत, पण हे लोक अँकरसाठी रस्त्यावर येतात, भाजपाचा भेसळयुक्त भगवा आहे. तो कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही. भाजपानं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु करावं, त्यांना बीएमसीमध्ये रस आहे कारण मुंबईतील आर्थिक उलाढाल, शेअर बाजार यावर भाजपाचं लक्ष्य आहे, मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणी  बनवायचं आहे, मुंबई विकायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची, श्रमिकांची, कष्टकऱ्यांची आहे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असा घणाघात शिवसेनेने भाजपा नेत्यांवर केला आहे.

जंगल वाचवणं हीच शिवसेनेची भूमिका

आरे मेट्रो कारशेड कांजूरला हलवल्यामुळे मुंबईकरांना मेट्रो सेवा मिळण्यास उशीर होणार आहे, पण स्वत:च्या हट्टापायी असा निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु कांजूरला मेट्रो हलवण्याची भूमिका शिवसेनेची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून होती, जंगल वाचवण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आरेत मेट्रो नेऊ नका यासाठी शिवसेनेचा विरोध होताच, सरकार आलं तेव्हा भूमिका घेतली नाही असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणात इशारे देणं ही लोकशाहीत महत्त्वाची भूमिका

राजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतात, काँग्रेस देतात, इतर पक्षांना देतात, राजकारणात वॉर्निंग हा शब्द इशारा म्हणून वापरतो, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर इशारा दिला जातो, लोकशाही संदर्भात आपली भूमिका असेल तर या गोष्टी सहजपणे घेतल्या पाहिजे, तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

बाळासाहेबांबाबत सगळ्यांच्या मनात श्रद्धा

बाळासाहेबांबाबत श्रद्धा सगळ्यांच्या मनात आहे, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशासाठी योगदान मोठे आहे, शिवसेनेला त्याचा आदर आहे, परंतु त्यांच्यासोबत राजकीय मतभेद असू शकतात. बाळासाहेबांबद्दल श्रद्धा सगळ्या नेत्यांच्या मनात आहे, त्यामुळे कोणी ट्विट केले नसेल तर ट्विटवरुन श्रद्धेचे प्रमाण ठरवलं जाऊ शकत नाही असं सांगत संजय राऊतांनी आमदार नितेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक