शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

By प्रविण मरगळे | Updated: November 19, 2020 10:53 IST

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

ठळक मुद्देराजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतातया लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतातआमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे.

मुंबई – राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र भाजपाच्या रणनीतीवर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे. मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा घाट भाजपाचा आहे. मुंबईला वेगळं करण्याचं राजकारण भाजपाचा आहे. मुंबई पोलिसांना माफिया बोलली, मुंबईला पीओके म्हंटली, ती नटी भाजपाची कार्यकर्तीच आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत मराठी माणसाने ज्याच्यामुळे आत्महत्या केली, त्या अँकरसाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना मराठी माणूस धडा शिकवेल. आम्ही सगळे अन्वय नाईक यांच्यामागे उभे आहोत, पण हे लोक अँकरसाठी रस्त्यावर येतात, भाजपाचा भेसळयुक्त भगवा आहे. तो कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही. भाजपानं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु करावं, त्यांना बीएमसीमध्ये रस आहे कारण मुंबईतील आर्थिक उलाढाल, शेअर बाजार यावर भाजपाचं लक्ष्य आहे, मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणी  बनवायचं आहे, मुंबई विकायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची, श्रमिकांची, कष्टकऱ्यांची आहे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असा घणाघात शिवसेनेने भाजपा नेत्यांवर केला आहे.

जंगल वाचवणं हीच शिवसेनेची भूमिका

आरे मेट्रो कारशेड कांजूरला हलवल्यामुळे मुंबईकरांना मेट्रो सेवा मिळण्यास उशीर होणार आहे, पण स्वत:च्या हट्टापायी असा निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु कांजूरला मेट्रो हलवण्याची भूमिका शिवसेनेची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून होती, जंगल वाचवण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आरेत मेट्रो नेऊ नका यासाठी शिवसेनेचा विरोध होताच, सरकार आलं तेव्हा भूमिका घेतली नाही असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणात इशारे देणं ही लोकशाहीत महत्त्वाची भूमिका

राजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतात, काँग्रेस देतात, इतर पक्षांना देतात, राजकारणात वॉर्निंग हा शब्द इशारा म्हणून वापरतो, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर इशारा दिला जातो, लोकशाही संदर्भात आपली भूमिका असेल तर या गोष्टी सहजपणे घेतल्या पाहिजे, तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

बाळासाहेबांबाबत सगळ्यांच्या मनात श्रद्धा

बाळासाहेबांबाबत श्रद्धा सगळ्यांच्या मनात आहे, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशासाठी योगदान मोठे आहे, शिवसेनेला त्याचा आदर आहे, परंतु त्यांच्यासोबत राजकीय मतभेद असू शकतात. बाळासाहेबांबद्दल श्रद्धा सगळ्या नेत्यांच्या मनात आहे, त्यामुळे कोणी ट्विट केले नसेल तर ट्विटवरुन श्रद्धेचे प्रमाण ठरवलं जाऊ शकत नाही असं सांगत संजय राऊतांनी आमदार नितेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक