शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

By प्रविण मरगळे | Updated: November 19, 2020 10:53 IST

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

ठळक मुद्देराजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतातया लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतातआमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे.

मुंबई – राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र भाजपाच्या रणनीतीवर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे. मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा घाट भाजपाचा आहे. मुंबईला वेगळं करण्याचं राजकारण भाजपाचा आहे. मुंबई पोलिसांना माफिया बोलली, मुंबईला पीओके म्हंटली, ती नटी भाजपाची कार्यकर्तीच आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत मराठी माणसाने ज्याच्यामुळे आत्महत्या केली, त्या अँकरसाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना मराठी माणूस धडा शिकवेल. आम्ही सगळे अन्वय नाईक यांच्यामागे उभे आहोत, पण हे लोक अँकरसाठी रस्त्यावर येतात, भाजपाचा भेसळयुक्त भगवा आहे. तो कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही. भाजपानं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु करावं, त्यांना बीएमसीमध्ये रस आहे कारण मुंबईतील आर्थिक उलाढाल, शेअर बाजार यावर भाजपाचं लक्ष्य आहे, मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणी  बनवायचं आहे, मुंबई विकायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची, श्रमिकांची, कष्टकऱ्यांची आहे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असा घणाघात शिवसेनेने भाजपा नेत्यांवर केला आहे.

जंगल वाचवणं हीच शिवसेनेची भूमिका

आरे मेट्रो कारशेड कांजूरला हलवल्यामुळे मुंबईकरांना मेट्रो सेवा मिळण्यास उशीर होणार आहे, पण स्वत:च्या हट्टापायी असा निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु कांजूरला मेट्रो हलवण्याची भूमिका शिवसेनेची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून होती, जंगल वाचवण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आरेत मेट्रो नेऊ नका यासाठी शिवसेनेचा विरोध होताच, सरकार आलं तेव्हा भूमिका घेतली नाही असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणात इशारे देणं ही लोकशाहीत महत्त्वाची भूमिका

राजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतात, काँग्रेस देतात, इतर पक्षांना देतात, राजकारणात वॉर्निंग हा शब्द इशारा म्हणून वापरतो, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर इशारा दिला जातो, लोकशाही संदर्भात आपली भूमिका असेल तर या गोष्टी सहजपणे घेतल्या पाहिजे, तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

बाळासाहेबांबाबत सगळ्यांच्या मनात श्रद्धा

बाळासाहेबांबाबत श्रद्धा सगळ्यांच्या मनात आहे, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशासाठी योगदान मोठे आहे, शिवसेनेला त्याचा आदर आहे, परंतु त्यांच्यासोबत राजकीय मतभेद असू शकतात. बाळासाहेबांबद्दल श्रद्धा सगळ्या नेत्यांच्या मनात आहे, त्यामुळे कोणी ट्विट केले नसेल तर ट्विटवरुन श्रद्धेचे प्रमाण ठरवलं जाऊ शकत नाही असं सांगत संजय राऊतांनी आमदार नितेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक