शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:36 IST

Sanjay Raut : "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

ठळक मुद्दे"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी "फेस टू फेस" या नव्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाविकास आघाडीची स्थापना यावरही उत्तर दिलं. 

"राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडणं आणि राज्यात महाविकास आघाडीची स्थापना होणं हे महाराष्ट्राच्या तसंच शिवसेनेच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. राज ठाकरे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा जवळच्या घडामोडीतला मी एक साक्षीदार आहे. खुप गोष्टी मी पाहिल्या. त्या दिवशी मी त्यांच्या घरी होती. त्या दिवशी त्यांचे लोक माझी गाडी तोडत होते हेदेखील मी पाहिलं. मनोहर जोशीही निघून गेले. मी जर लिहायला गेलो तर खूप मोठे स्फोट होतील," असं संजय राऊत म्हणाले. 

राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

"महाविकास आघाडीच्या घटनाक्रमाबद्दल अनेकांनी लिहिलं. पण अनेकांनी लिहिलेल्या घटनाक्रमात काहीच अर्थ नाहीये. अनेकदा लोकं मला राजकारणावर लिहा, सिंहासन २ लिहा असं सांगतात. आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, आपण का लोकांना अडचणीत आणायचं?," असा सवालही त्यांनी केला. जे तुम्ही वाचता त्यात काही सत्य नाही. पडद्यामागे काही वेगळंच घडलं आहे, आज जे सत्तेत बसलेत त्यांनाही त्या पडद्यामागची पटकथा माहित नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं.  राजकारणात नसतो तर..."राजकारणात नसतो तर मी पत्रकारचं झालो असतो. पत्रकारीतेलाच मी माझा पेशा म्हणून स्वीकारलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असल्यामुळे राजकारणात आलो. सामना या वृत्तपत्राची दखल ही सर्वत्र घेतली जाते. त्याचा संपादक हा राजकारणीच असतो. संपादकांना एखादी भूमिका असावी, ती नसली तर वृत्तपत्र पुढे नेता येणार नाही. टिळक, आगरकर, अत्रे यांनाही भूमिका होती," असंही राऊत म्हणाले.

"सामना हे माझं खरं घर आहे. माझं अख्ख आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे