शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेसचा ‘डबल’ धमाका, शिवसेनेला जोरदार धक्का; माजी मंत्र्याचा थेट दिल्लीत होणार पक्षप्रवेश

By प्रविण मरगळे | Updated: July 13, 2021 18:19 IST

शिवसेनेच्या दोन नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून लवकरच त्याबाबत अधिकृत तारीख निश्चित केली जाणार आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अशोक शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षनेतृत्वाकडे न्याय मागूनही मिळाला नाही त्यामुळे अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर गेले आहेत.अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल.

प्रविण मरगळे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर अलीकडेच नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनं शिवसेनेला(Shivsena) ‘डबल’ धमाका देण्याचं ठरवलं आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे. 

कोण आहेत अशोक शिंदे?

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अशोक शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचसोबत युती सरकारच्या काळात अशोक शिंदे(Ashok Shinde) यांच्याकडे उद्योग राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. १९९५ मध्ये पहिल्यांदा अशोक शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विदर्भातील वर्धा जिल्ह्यात निवडून आले होते. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत त्यांचे वाद होते. या प्रकरणी पक्षनेतृत्वाकडे न्याय मागूनही मिळाला नाही त्यामुळे अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर गेले आहेत.

कोण आहे सुरेश म्हात्रे?

ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जातात. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर. पण कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही, अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. अशोक शिंदे आणि सुरेश म्हात्रे या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश दिल्लीत दणक्यात करणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत तारीख निश्चित केली नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले