शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:43 IST

पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय.

- सुकृत करंदीकरपश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. सन २०१४ मध्ये भाजपाने पुणे मतदारसंघ विक्रमी मताधिक्याने जिंकला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेला नाकारत पुण्यातल्या सहाच्या सहा विधानसभा भाजपाच्या पारड्यात टाकल्या. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत तर भाजपाने पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. आता महापालिकेपासून मुंबई-दिल्लीपर्यंत ‘शत-प्रतिशत भाजपा’ अशी पुण्याची स्थिती आहे. संघटनात्मक पातळीवर कधी नव्हे, इतके सर्व थरातील कार्यकर्ते भाजपाच्या बाजूला आहेत. इतकी ताकद भाजपाला पुण्यात यापूर्वीच्या इतिहासात कधीच लाभलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुणे हा भाजपासाठी केवळ प. महाराष्ट्रातलाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणावा लागेल.अर्थात, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. भाजपाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनाच २०१९ मध्ये पुन्हा उमेदवारी मिळणार का, इथून संभ्रम चालू होतो. खासदार म्हणून शिरोळे यांची कामगिरी लक्षणीय असली तरी केलेल्या कामांची प्रसिद्धी आणि जनसंपर्क या पातळीवर शिरोळे कमी पडतात, असे भाजपातून सांगितले जाते. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपाचा उमेदवार कोण, याबद्दलचा निर्णय तूर्तास अधांतरी आहे. काँग्रेस आघाडीकडून कोण उमेदवार येतो, याचा अंदाज घेऊन भाजपाचा उमेदवार निश्चित केला जाऊ शकतो.उमेदवार निवडीबाबत काँग्रेसमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. आघाडीच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र राज्यस्तरीय वाटाघाटींमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का, ही भीती काँग्रेसजनांना आहे. पुणे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्लाही आहे. अडीच-तीन लाखांची त्यांची हक्काची मतपेढी येथे आहे. विजयास आवश्यक त्या पुढची मते कोण खेचू शकतो, याबद्दलचे पर्याय तपासले जात आहेत. यातूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आले. गायकवाड यांच्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाची तसेच काँग्रेसअंतर्गत गटबाजीची भीती निष्ठावंत व्यक्त करतात. त्यामुळेच उमेदवारीचा वाद सध्या दिल्लीदरबारी आहे. पुण्यातली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवरच लढली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस एकदिलाने लढल्या तर शक्ती असूनही भाजपाची दमछाक होऊ शकते. पण काँग्रेसला एकसंध कोण ठेवणार, हाच महत्त्वाचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.>सध्याची परिस्थितीसंघटनात्मक पातळीवर भाजपाची वाटचाल जोरदार आहे. कधी काळी ठराविक वर्गापुरता मर्यादित भाजपा सर्व स्तरांत पसरला आहे. संघाचे संघटन जोडीला आहे. सन २०१४ पासूनच्या तीन सलग पराभवांनी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर व्हायला तयार नाही. संघटन मजबूत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी गटबाजीचा जोर अजून कायम आहे.मनसेच्या विश्वासार्हतेला जोरदार धक्का बसला आहे. मनसे काँग्रेस आघाडीला मदत करणार की स्वतंत्र लढणार, याचा निर्णय अजून न झाल्याने पक्षपातळीवर सामसूम आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा स्वतंत्र उमेदवार कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याबद्दल तर्कवितर्क आहेत. आंबेडकर-ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९