शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:43 IST

पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय.

- सुकृत करंदीकरपश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. सन २०१४ मध्ये भाजपाने पुणे मतदारसंघ विक्रमी मताधिक्याने जिंकला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेला नाकारत पुण्यातल्या सहाच्या सहा विधानसभा भाजपाच्या पारड्यात टाकल्या. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत तर भाजपाने पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. आता महापालिकेपासून मुंबई-दिल्लीपर्यंत ‘शत-प्रतिशत भाजपा’ अशी पुण्याची स्थिती आहे. संघटनात्मक पातळीवर कधी नव्हे, इतके सर्व थरातील कार्यकर्ते भाजपाच्या बाजूला आहेत. इतकी ताकद भाजपाला पुण्यात यापूर्वीच्या इतिहासात कधीच लाभलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुणे हा भाजपासाठी केवळ प. महाराष्ट्रातलाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणावा लागेल.अर्थात, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. भाजपाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनाच २०१९ मध्ये पुन्हा उमेदवारी मिळणार का, इथून संभ्रम चालू होतो. खासदार म्हणून शिरोळे यांची कामगिरी लक्षणीय असली तरी केलेल्या कामांची प्रसिद्धी आणि जनसंपर्क या पातळीवर शिरोळे कमी पडतात, असे भाजपातून सांगितले जाते. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपाचा उमेदवार कोण, याबद्दलचा निर्णय तूर्तास अधांतरी आहे. काँग्रेस आघाडीकडून कोण उमेदवार येतो, याचा अंदाज घेऊन भाजपाचा उमेदवार निश्चित केला जाऊ शकतो.उमेदवार निवडीबाबत काँग्रेसमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. आघाडीच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र राज्यस्तरीय वाटाघाटींमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का, ही भीती काँग्रेसजनांना आहे. पुणे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्लाही आहे. अडीच-तीन लाखांची त्यांची हक्काची मतपेढी येथे आहे. विजयास आवश्यक त्या पुढची मते कोण खेचू शकतो, याबद्दलचे पर्याय तपासले जात आहेत. यातूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आले. गायकवाड यांच्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाची तसेच काँग्रेसअंतर्गत गटबाजीची भीती निष्ठावंत व्यक्त करतात. त्यामुळेच उमेदवारीचा वाद सध्या दिल्लीदरबारी आहे. पुण्यातली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवरच लढली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस एकदिलाने लढल्या तर शक्ती असूनही भाजपाची दमछाक होऊ शकते. पण काँग्रेसला एकसंध कोण ठेवणार, हाच महत्त्वाचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.>सध्याची परिस्थितीसंघटनात्मक पातळीवर भाजपाची वाटचाल जोरदार आहे. कधी काळी ठराविक वर्गापुरता मर्यादित भाजपा सर्व स्तरांत पसरला आहे. संघाचे संघटन जोडीला आहे. सन २०१४ पासूनच्या तीन सलग पराभवांनी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर व्हायला तयार नाही. संघटन मजबूत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी गटबाजीचा जोर अजून कायम आहे.मनसेच्या विश्वासार्हतेला जोरदार धक्का बसला आहे. मनसे काँग्रेस आघाडीला मदत करणार की स्वतंत्र लढणार, याचा निर्णय अजून न झाल्याने पक्षपातळीवर सामसूम आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा स्वतंत्र उमेदवार कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याबद्दल तर्कवितर्क आहेत. आंबेडकर-ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९