शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

"पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 10:51 IST

लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

ठळक मुद्देकोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहेमहाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीतघरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही

मुंबई – राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते, महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का? याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कोणाचं कोणाला पटत नाही असं सांगत भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर प्रहार केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. मुंबईत ४ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे, याला जबाबदार कोण? रोज नवीन आदेश काढले जात आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही, महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत. बेजबाबदारपणे सरकार वागत आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच राज्यातील जनता सुरक्षित नाही, देशात सर्वाधिक भयंकर परिस्थिती राज्यात आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. रुग्णांची अवस्था काय आहे? ना औषध ना उपचार ना काही, सरकारमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही, लोकांचे व्यवहार बंद आहेत, लोक त्रस्त झालेत, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? घरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही, सपशेल अपयशी ठरलं आहे. लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

शरद पवार काहीही घडवू शकतात...

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावरुन प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, शरद पवार प्रस्ताव देतात ते एकाच पक्षाला देतात यावर विश्वास कितपत ठेवावा, हे विचार करावं असा सल्ला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. जे झालं ते झालं त्याला इतिहास साक्ष आहे, पवारांकडून राजकीय आणि सरकारबद्दल प्रस्ताव येतात ते आपल्यालाच दिला असेल असं विश्वास ठेऊन पुढे जाऊ नये असं मला वाटतं. चीनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी राष्ट्रीय भावनेतून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असेल, त्यांचे विधान काँग्रेसला एकाकी पाडण्याबाबत नसावं, पण शरद पवार काहीही घडवू शकतात असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस