शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भिवंडी मतदारसंघात सात पदवीधर उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:52 AM

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून अखेर १५ उमेदवार रिंगणात आहेत.

पंढरीनाथ कुंभार भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून अखेर १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का २० आहे.१५ पैकी तीन उमेदवार उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत हे माजी कुलगुरू आहेत. त्याचबरोबर तीन उमेदवार पदव्युत्तर, तर तीन जण पदवीधर आहेत.बारावी आणि त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांचा टक्का ५३ इतका आहे. तीन उमेदवार बारावी, तर चारजण बारावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. मतदारसंघातील १५ उमेदवारांपैकी सात अपक्ष, तर उरलेले आठ उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत. या उमेदवारांच्या शिक्षणाचा एकंदरीत आढावा घेता उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.दहावीपुढील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ११ आहे. तर, दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची टक्केवारी ५३ इतकी असून त्यांची संख्या चार आहे. यातील एक उमेदवार अशिक्षित आहे.>वाणिज्य शाखेचे सर्वाधिक पदवीधरसर्व पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयातील सर्वाधिक तीन उमेदवार पदवीधर आहेत. तर, दोन वाणिज्य व दोन वैद्यकीय शाखेतील पदवीधर आहेत. त्यापैकी एक मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तर, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर, एक वकील आहे.>अल्पशिक्षितांचीभाऊगर्दीभिवंडी मतदारसंघात भिवंडी, कल्याण, बदलापूर ही प्रमुख तीन शहरे येतात. त्यातील मतदार सुशिक्षित आहेत. सध्या रिंगणात असलेले सहा उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मात्र, उर्वरित नऊ उमेदवार अल्पशिक्षित आहेत. यात दहावी नापास दोन उमेदवार आहेत. आठवी व पाचवी उत्तीर्ण असलेल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या सहा असून उच्चशिक्षितांचा पुढाकार या मतदारसंघात फारसा दिसून येत नाही.>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?सर्वाधिक पदव्याअसलेले तीन उमेदवारसर्वाधिक पदव्या असलेले तीनही उमेदवार राजकीय पक्षांचे असून एका उमेदवाराकडे चार तर दोघांकडे प्रत्येकी दोन पदव्या आहेत. त्यापैकी एकाकडे वाणिज्य पदवीसह वकिली क्षेत्रातील आणि संगणकाची पदवी आहे. तर, दोघांकडे विज्ञानाची पदवी आहे.दहावी, बारावीउत्तीर्णांची संख्या चारदहावी उत्तीर्ण एक, तर बारावी उत्तीर्ण झालेले तीन उमेदवार आहेत. हे चारही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, दहावी व त्यापेक्षा कमी शिकलेले तीन उमेदवारही अपक्ष आहेत.अशिक्षित उमेदवारही आखाड्यातएका राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक अर्हतेपुढे ‘नाही’ असे नमूद केले आहे. यावरून अशिक्षित उमेदवारही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुशिक्षित मतदार कोणाच्या पदरात मते टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी