“...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र

By प्रविण मरगळे | Published: February 22, 2021 03:04 PM2021-02-22T15:04:16+5:302021-02-22T15:06:14+5:30

Health Minister Rajesh Tope Letter: लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले.

Sensitive letter from Health Minister Rajesh Tope from the hospital on Corona | “...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र

“...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र

Next
ठळक मुद्देमी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहेलॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिलामागील वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता, मी राज्यातील अनेक भागात गेलो

मुंबई – राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करताना सूचक इशारा दिला आहे, कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे.(Health Minister Rajesh Tope wrote letter to Maharashtra People over Corona increase in State Again) 

राजेश टोपे(Rajesh Tope)  यांनी हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, शासनाची खंबीर भूमिका ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे, तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे, मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मागील वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता, मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच, मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे, समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे, म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला, मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही, लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले. दरम्यान, स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी, तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला, एकजुटीने, एकमताने आणि एकनिर्धाराने असंही राजेश टोपे म्हणाले.  

Web Title: Sensitive letter from Health Minister Rajesh Tope from the hospital on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.