शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काँग्रेसला १५ दिवसांत दुसरा धक्का?; आणखी एक मोठा नेता भाजपात सहभागी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 18:05 IST

कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. भाजपाही त्यांना उमेदवारी देण्यास तयारी होती. परंतु नवीनचे वडील ओमप्रकाश जिंदल यांनी त्यांची समजूत काढली.

ठळक मुद्देओमप्रकाश जिंदल त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या सांगण्यानुसार नवीन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. सलग २००४, २००९ मधून निवडून आलेल्या नवीन जिंदल यांना २०१४ मध्ये पराभव सहन करावा लागला२०१४ च्या निवडणुकीत नवीन जिंदल यांना हरवण्यासाठी सुभाष चंद्रा हे कुरूक्षेत्रातच वास्तव्यास होते.

पानीपत – सध्या देशातील अनेक राज्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अलीकडेच काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. हरियाणात अनेक चेहरे भाजपात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. कुरुक्षेत्र येथून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले नवीन जिंदल यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. २००४ च्या निवडणुकीपूर्वी युवा नवीन जिंदल यांची पहिली पसंती भाजपाला होती हे खूप कमी लोकांना माहिती आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ते चाहते होते.

कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. भाजपाही त्यांना उमेदवारी देण्यास तयारी होती. परंतु नवीनचे वडील ओमप्रकाश जिंदल यांनी त्यांची समजूत काढली. ओमप्रकाश जिंदल त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या सांगण्यानुसार नवीन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २००९ मध्येही ते जिंकले. परंतु २०१४ मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिली नाही. नवीन जिंदल यांनी काँग्रेसमधून लढावं अशी राहुल गांधींची इच्छा होती. परंतु त्यांच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते.

निवडणुकीच्या आधी नवीन जिंदल यांनी मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी राहुल गांधी यांचा कुरूक्षेत्रचा दौरा झाला. त्यांची सभा झाली. नवीन जिंदल राहुल गांधी यांच्या मंचावर गेले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय नवीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना समजवून भाजपामधून लढण्यास सांगितले. एकीकडे भावाचा आग्रह तर दुसरीकडे राहुल गांधींची इच्छा या कात्रीत नवीन जिंदल अडकले. आणि त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

नवीन जिंदल हे त्यावेळी काँग्रेस सोडू शकत नव्हते. अद्यापही ते काँग्रेसमध्येच आहेत. परंतु राजकारणात सक्रीय नाहीत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात आहेत त्याची चर्चाही होत नाही. नवीन जिंदल आणि भाजपाचे सुभाष चंद्रा यांच्यात वाद असल्यानेही ते भाजपासोबत गेले नाही असंही सांगितले जाते. सुभाष चंद्रा एका माध्यम समुहाचे प्रमुख आहेत. जेव्हा या दोघांमध्ये वाद झाला तेव्हा नवीन जिंदाल काँग्रेसमध्ये होते. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. २०१४ च्या निवडणुकीत नवीन जिंदल यांना हरवण्यासाठी सुभाष चंद्रा हे कुरूक्षेत्रातच वास्तव्यास होते.

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आल्या. सुभाष चंद्रा यांनी नवीनच्या आई सावित्री जिंदल यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला. सावित्री जिंदलही पराभूत झाल्या. जिंदल कुटुंबाला हा सर्वात मोठा धक्का होता. परंतु सुभाष चंद्रा यांना अपेक्षेप्रमाणे भाजपात महत्त्व मिळालं नाही. हरियाणा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांचे सुभाष चंद्रा यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. दिल्लीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांच्यावर काही गटाने हल्ला केला होता. त्यावेळी काँग्रेस हायकमांडनं मौन बाळगलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तंवर यांनी काँग्रेस सोडली.

आता जिंदल-चंद्रा यांच्यात समझोता झाला आहे. यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सुभाष चंद्रा यांच्याशी झालेल्या तडजोडीनंतर आता नवीन जिंदल यांना भाजपा आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नवीन जिंदल यांचे मेव्हणे मनमोहन गोयल हे भाजपात आहेत. ते रोहतक येथील महापौर आहेत. त्यामुळे आगामी काळात हरियाणा राजकीय उलथापालथ होऊन नवीन जिंदल भाजपात सहभागी होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस