शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

"गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी तोसुद्धा विकून टाकतील", प्रियंका गांधींचा घणाघात

By बाळकृष्ण परब | Updated: February 23, 2021 16:39 IST

Priyanka Gandhi lashes out BJP & Central Government farm law : कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे.

मथुरा - कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून (Farmers Protest) आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh ) शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले जात आहे. आज मथुरेतील पालीखेडा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या अशाच एका महापंचायतीला प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संबोधित केले. तसेच यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ("Save Govardhan Parvat, otherwise Modi Government will sell it tomorrow", Priyanka Gandhi lashes out BJP & Central Government )मोदींवर जोरदार टीका करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अहंकारी आणि भेकड असा केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आधीच्या सरकारांनी जर काहीच केलं नाही तर मोदी विकत काय आहेत. तुमच्या सरकारने केवळ नोटाबंदी आणि जीएसटी तयार केला. त्यामुळे जनता त्रस्त आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच जोपर्यंत तीन कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील. तसेच आमचे सरकार येताच हे कायदे रद्द केले जातील, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.प्रियंका गांधी यांनी म्हणाल्या की, मोदी सरकारने एलआयसीशिवाय अनेक अन्य कंपन्या विक्रीस काढत आहे. आता तुम्ही गोवर्धन पर्वत वाचवा, नाहीतर मोदी सरकारा उद्या तोसुद्धा विकून टाकेल. मोदींचे शेतकऱ्यांसोबत नेमके कोणते वैर आहे ते कळत नाही. मोदी संसदेत शेतकऱ्यांचा अवमान करतात. त्याचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी बोलतात. जेव्हा संसदेत राहुल गांधींनी संसदेत मौन पाळले तेव्हा सरकारने त्यामध्ये सहभाग घेतला नाही.मथुरेची ही भूमी अहंकार मोडून काढते. भाजपा सरकारनेसुद्धा अन्नदात्याविरोधात अहंकार बाळगला आहे. ९० दिसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपली लढाई लढत आहेत. २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या काळात मोदी जगभरात सगळीकडे पोहोचले. मात्र त्यांना या शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही, असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला.प्रियंका गांधी म्हणाल्या की, या सरकारचा विवेक मेला आहे. भगवान श्रीकृष्ण यांचासुद्धा अहंकार तोडणार आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी आपल्यासाठी दोन विमाने खरेदी केली. मात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम दिली नाही. या सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढत आहेत.

 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण