शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:21 IST

RSS का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवेसंजय राऊत यांनी केली प्रतिक्रिया व्यक्त

मुंबई: कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून, आता देशभरातील मुस्लीम भागांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संघ का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country)

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

मग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समाजात काम करण्याचे ठरवले आहे. संघ का बदलतोय. आपण आतापर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला आहात. मतांसाठी धार्मिक विभाजन करण्यात आले. त्यात हिंदू आणि मुस्लीम समाजाचे अनेक बळी गेले. मात्र, आता परिवर्तन होत असेल आणि देशाच्या अखंडतेला त्यातून बळ मिळाणार असेल, तर त्यासंदर्भात विचार करायला पाहिजे. संघाचे कार्य नक्कीच चांगले आहे. संघाच्या काही भूमिकांवर आम्हीही चर्चा केल्या आहेत. मात्र, संघाला आता स्वतःला बदलावेसे वाटत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS चा आयटी सेल

संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचे काम पोहोचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे. 

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दरम्यान, काँग्रेस पक्ष हा १०० वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण