शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:21 IST

RSS का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवेसंजय राऊत यांनी केली प्रतिक्रिया व्यक्त

मुंबई: कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून, आता देशभरातील मुस्लीम भागांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संघ का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country)

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

मग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समाजात काम करण्याचे ठरवले आहे. संघ का बदलतोय. आपण आतापर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला आहात. मतांसाठी धार्मिक विभाजन करण्यात आले. त्यात हिंदू आणि मुस्लीम समाजाचे अनेक बळी गेले. मात्र, आता परिवर्तन होत असेल आणि देशाच्या अखंडतेला त्यातून बळ मिळाणार असेल, तर त्यासंदर्भात विचार करायला पाहिजे. संघाचे कार्य नक्कीच चांगले आहे. संघाच्या काही भूमिकांवर आम्हीही चर्चा केल्या आहेत. मात्र, संघाला आता स्वतःला बदलावेसे वाटत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS चा आयटी सेल

संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचे काम पोहोचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे. 

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दरम्यान, काँग्रेस पक्ष हा १०० वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण