शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:21 IST

RSS का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवेसंजय राऊत यांनी केली प्रतिक्रिया व्यक्त

मुंबई: कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून, आता देशभरातील मुस्लीम भागांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संघ का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country)

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

मग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समाजात काम करण्याचे ठरवले आहे. संघ का बदलतोय. आपण आतापर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला आहात. मतांसाठी धार्मिक विभाजन करण्यात आले. त्यात हिंदू आणि मुस्लीम समाजाचे अनेक बळी गेले. मात्र, आता परिवर्तन होत असेल आणि देशाच्या अखंडतेला त्यातून बळ मिळाणार असेल, तर त्यासंदर्भात विचार करायला पाहिजे. संघाचे कार्य नक्कीच चांगले आहे. संघाच्या काही भूमिकांवर आम्हीही चर्चा केल्या आहेत. मात्र, संघाला आता स्वतःला बदलावेसे वाटत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS चा आयटी सेल

संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचे काम पोहोचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे. 

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दरम्यान, काँग्रेस पक्ष हा १०० वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण