शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 14:55 IST

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण पेटलं

ठळक मुद्देभगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेतसर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत

भोपाळ – भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पेटलं आहे. रविवारी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोणीतरी काँग्रेस कार्यालयाबाहेर सरकारी पोलवर भगवा झेंडा फडकवला, त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं.  

या प्रकरणी कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, भगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेत, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. काँग्रेसवाल्यांनी भगव्याचा आदर करावा. विशेष म्हणजे रविवारी कॉंग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आले. गोविंद सिंह यांनी आमदारांच्या प्रश्नाकडून भाजपा पळ काढतेय असा आरोप केला तर विश्वास सारंग यांनी कॉंग्रेस नेत्यावर खोटी विधाने करून विधानसभा अधिवेशन तहकूब केल्याचा आरोप केला. माजी मंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. सध्या विधानसभेत बावीस हजार प्रश्न प्रलंबित आहेत. याची उत्तरे यायला हवीत.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना पत्र लिहिणार

माजी मंत्री म्हणाले की, या प्रकरणात प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा आणि सीएम शिवराज यांनाही पत्र देतील. सर्वपक्षीय बैठकीत आमदारांना प्रश्‍न देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत सहमती दर्शविली गेली होती, परंतु अधिवेशन तहकूब झाल्यामुळे समिती अद्याप स्थापन झालेली नाही. सार्वजनिक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने राज्यात अराजकता वाढत आहे.

कॉंग्रेसमुळे विधानसभा अधिवेशन तहकूब

डॉ गोविंद सिंह यांच्यावर पलटवार करताना कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, विरोधकांमुळे आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती. विधानसभेचे अधिवेशन व्हावे अशी कॉंग्रेसची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले, राज्य सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.

युवक शिबिरावरही विश्वास सारंग यांनी लावले आरोप

युवक कॉंग्रेसच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात राजकारण सुरू झालं आहे. युवक कॉंग्रेसला आक्रमक व्हावे लागेल, आक्रमकता ही युवक कॉंग्रेसची ओळख आहे. संजय गांधींच्या काळात युवक कॉंग्रेस ही सर्वात मजबूत संघटन होतं. विक्रांत भूरिया यांच्या नेतृत्वात युथ कॉंग्रेस पुन्हा मजबूत होईल असं डॉ. गोविंद सिंह म्हणाले, त्यावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, युवक कॉंग्रेसची ओळख ही भ्रष्ट संघटन आणि अनुशासनहीन आहे. युवक कॉंग्रेसने तरुणांमधील विश्वासार्हता गमावली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा