शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 14:55 IST

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण पेटलं

ठळक मुद्देभगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेतसर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत

भोपाळ – भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पेटलं आहे. रविवारी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोणीतरी काँग्रेस कार्यालयाबाहेर सरकारी पोलवर भगवा झेंडा फडकवला, त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं.  

या प्रकरणी कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, भगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेत, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. काँग्रेसवाल्यांनी भगव्याचा आदर करावा. विशेष म्हणजे रविवारी कॉंग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आले. गोविंद सिंह यांनी आमदारांच्या प्रश्नाकडून भाजपा पळ काढतेय असा आरोप केला तर विश्वास सारंग यांनी कॉंग्रेस नेत्यावर खोटी विधाने करून विधानसभा अधिवेशन तहकूब केल्याचा आरोप केला. माजी मंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. सध्या विधानसभेत बावीस हजार प्रश्न प्रलंबित आहेत. याची उत्तरे यायला हवीत.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना पत्र लिहिणार

माजी मंत्री म्हणाले की, या प्रकरणात प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा आणि सीएम शिवराज यांनाही पत्र देतील. सर्वपक्षीय बैठकीत आमदारांना प्रश्‍न देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत सहमती दर्शविली गेली होती, परंतु अधिवेशन तहकूब झाल्यामुळे समिती अद्याप स्थापन झालेली नाही. सार्वजनिक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने राज्यात अराजकता वाढत आहे.

कॉंग्रेसमुळे विधानसभा अधिवेशन तहकूब

डॉ गोविंद सिंह यांच्यावर पलटवार करताना कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, विरोधकांमुळे आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती. विधानसभेचे अधिवेशन व्हावे अशी कॉंग्रेसची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले, राज्य सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.

युवक शिबिरावरही विश्वास सारंग यांनी लावले आरोप

युवक कॉंग्रेसच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात राजकारण सुरू झालं आहे. युवक कॉंग्रेसला आक्रमक व्हावे लागेल, आक्रमकता ही युवक कॉंग्रेसची ओळख आहे. संजय गांधींच्या काळात युवक कॉंग्रेस ही सर्वात मजबूत संघटन होतं. विक्रांत भूरिया यांच्या नेतृत्वात युथ कॉंग्रेस पुन्हा मजबूत होईल असं डॉ. गोविंद सिंह म्हणाले, त्यावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, युवक कॉंग्रेसची ओळख ही भ्रष्ट संघटन आणि अनुशासनहीन आहे. युवक कॉंग्रेसने तरुणांमधील विश्वासार्हता गमावली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा