शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नितीशकुमार सरकार बरखास्त करा -तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 06:18 IST

आमदारांना मारहाण प्रकरण तापले

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना झालेल्या मारहाणीचा विषय पुन्हा तापत चालला आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी केली.आमदारांना मारहाणीच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यवहार किंवा मर्यादेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.सिन्हा म्हणाले की, आमदारांच्या प्रतिष्ठेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि सभागृहाची अस्मिता सर्वांत मोठी आहे. आमदारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश आयुक्त तथा पोलीस महानिरीक्षकांना सिन्हा यांनी दिले. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा परिसरात आमदारांना बुटांनी मारहाण करणारे दोषी पोलीस अधिकारी आणि जवानांंवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तेजस्वी यादव यांनी पत्रात लिहिले की, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ज्या प्रकारे सभागृहात विरोधी सदस्यांना क्रूरपणे मारहाण करून ‘बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१’ ज्या प्रकारे संमत केले गेले ते लोकशाहीला घातक आहे. राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी सरकार बरखास्त करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली.नितीशकुमारांनी घेतला चिराग यांचा बदलालोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि संसद सदस्य चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू व मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर अखेर नितीशकुमार यांनी चिराग यांचा बदला घेतला आहे.एलजेपीचे एकमेव आमदार राजकुमार सिंह यांना जेडीयूत दाखल करून घेतले आहे. राजकुमार सिंह हे मटिहानीचे आमदार आहेत. पक्षाच्या महासचिवांकडून कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ते नाराज होते. त्यातूनच त्यांनी जेडीयूत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत पासवान यांच्या लोजपाने जेडीयूच्या व्होट बँकेला मोठा हादरा दिला. जेडीयूचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेचे जेडीयू केवळ ४३ जागा जिंकू शकला.या निवडणुकीत सर्वाधिक ७५ जागा राजदने जिंकल्या. भाजपने ७४, तर लोजपाने एक जागा जिंकली. राजकुमार सिंह म्हणाले की, हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव