शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित

By मोरेश्वर येरम | Updated: December 29, 2020 12:07 IST

राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं महत्वपूर्ण विधान.

ठळक मुद्देभाजप आणि 'जदयू'तील तणावादरम्यान 'राजद'ने साधला डाव'राजद'ने दिली नितीश कुमारांना जबरदस्त ऑफरअरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने 'जदयू'चे सहा आमदार फोडले

पाटणाभाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये (जदयू) तणाव निर्माण झाल्याचं वातावरण लक्षात घेता राष्ट्रीय जनता दलाने (राजद) राजकीय घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

"नितीश कुमार यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यादव यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं. तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी नितीश कुमार यांना देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू", असं विधान राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केलं आहे. 

नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले असले तरी भाजपचं राज्यावर अधिकार सांगत असल्याचं स्पष्टपणे दिसतं, असं म्हणत राजद नेत्यांनी जदयू आणि भाजपमध्ये पडलेल्या ठिणगीला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

अरुणाचल प्रदेशमधील जदयूच्या ६ आमदारांना फोडून भाजपने आपल्या गटात सामील करुन घेतलं. त्यानंतर भाजप युतीधर्माचं पालन करत नसल्याचा आरोप करत जदयूने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपकडून जदयूच्या नाराजीवर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे. राज्यसभा सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जदयूसोबतची युती भक्कम असल्याचं वक्तव्य केलं आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद नको असतानाही त्यांच्याच निवडीसाठी भाजप आग्रही होतं, असं वक्तव्य केलं आहे. 

"राज्याचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं वक्तव्य करण्याचा नितीश कुमार यांना वैयक्तिक अधिकार आहे. पण त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी एनडीएची इच्छा होती. ते आधीपासूनच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे एनडीएचे उमेदवार होते", असं सुशीलकुमार मोदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

'जदयू'मध्ये 'भाजप'बद्दल खदखद'जदयू'च्या नेत्यांमध्ये भाजपबद्दल खदखद असल्याचा दावा यावेळी उदय नारायण चौधरी यांनी केला. "तुम्ही जदयूच्या कोणत्याही नेत्याला विचारलं की ते सांगतील की चिराग पासवान यांना भाजपने प्रॉक्सीम्हणून निवडणुकीला उभं केलं होतं. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी जदयूचे उमेदवार पराभूत झाले. जदयूच्या बैठकीतही याबाबत जाहीररित्या वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यानंतर आता अरुणाचलमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर तरी जदयूचे डोळे उघडतील अशी आशा आहे", असं नारायण चौधरी म्हणाले.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकprime ministerपंतप्रधान