शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित

By मोरेश्वर येरम | Updated: December 29, 2020 12:07 IST

राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं महत्वपूर्ण विधान.

ठळक मुद्देभाजप आणि 'जदयू'तील तणावादरम्यान 'राजद'ने साधला डाव'राजद'ने दिली नितीश कुमारांना जबरदस्त ऑफरअरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने 'जदयू'चे सहा आमदार फोडले

पाटणाभाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये (जदयू) तणाव निर्माण झाल्याचं वातावरण लक्षात घेता राष्ट्रीय जनता दलाने (राजद) राजकीय घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

"नितीश कुमार यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यादव यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं. तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी नितीश कुमार यांना देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू", असं विधान राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केलं आहे. 

नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले असले तरी भाजपचं राज्यावर अधिकार सांगत असल्याचं स्पष्टपणे दिसतं, असं म्हणत राजद नेत्यांनी जदयू आणि भाजपमध्ये पडलेल्या ठिणगीला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

अरुणाचल प्रदेशमधील जदयूच्या ६ आमदारांना फोडून भाजपने आपल्या गटात सामील करुन घेतलं. त्यानंतर भाजप युतीधर्माचं पालन करत नसल्याचा आरोप करत जदयूने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपकडून जदयूच्या नाराजीवर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे. राज्यसभा सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जदयूसोबतची युती भक्कम असल्याचं वक्तव्य केलं आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद नको असतानाही त्यांच्याच निवडीसाठी भाजप आग्रही होतं, असं वक्तव्य केलं आहे. 

"राज्याचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं वक्तव्य करण्याचा नितीश कुमार यांना वैयक्तिक अधिकार आहे. पण त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी एनडीएची इच्छा होती. ते आधीपासूनच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे एनडीएचे उमेदवार होते", असं सुशीलकुमार मोदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

'जदयू'मध्ये 'भाजप'बद्दल खदखद'जदयू'च्या नेत्यांमध्ये भाजपबद्दल खदखद असल्याचा दावा यावेळी उदय नारायण चौधरी यांनी केला. "तुम्ही जदयूच्या कोणत्याही नेत्याला विचारलं की ते सांगतील की चिराग पासवान यांना भाजपने प्रॉक्सीम्हणून निवडणुकीला उभं केलं होतं. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी जदयूचे उमेदवार पराभूत झाले. जदयूच्या बैठकीतही याबाबत जाहीररित्या वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यानंतर आता अरुणाचलमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर तरी जदयूचे डोळे उघडतील अशी आशा आहे", असं नारायण चौधरी म्हणाले.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकprime ministerपंतप्रधान