शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत फेरबदल; के.सी पाडवी विधानसभाध्यक्ष; तर अमित देशमुख प्रदेशाध्यक्ष?

By अतुल कुलकर्णी | Updated: February 5, 2021 08:57 IST

आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती.

ठळक मुद्दे. पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन  पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे असे एक नियोजन आहे. सरकार बनवतेवेळी विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.पटोले यांना मंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावरदेखील खल सुरू

अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त जागेवर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची तर प्रदेशाध्यक्षपदासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या नावांची चर्चा आहे. नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती. काँग्रेस वाढवायची असेल तर मोठे बदल करावे लागतील यावर पक्षात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्या हालचाली घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन  पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे असे एक नियोजन आहे. यानिमित्ताने विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान आदिवासी समाजाला पहिल्यांदाच दिला जाईल. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, सरकार बनवतेवेळी विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.

खल सुरू....पटोले यांना मंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावरदेखील खल सुरू आहे. अमित देशमुख यांना मंत्रिपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. अमित देशमुख हे पटोले यांच्या तुलनेने कमी आक्रमक आहेत. तीन पक्षांचे सरकार चालविताना आक्रमकपणा अडचणीचा होऊ शकतो, असा एक सूर पुढे आला आहे.  सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट आहेत.  चव्हाण गटाला अमित देशमुख नको आहेत तर थोरात यांना अमित प्रदेशाध्यक्ष झाले तर चालतील, अशी परिस्थिती आहे.

तिन्ही पक्षांना मान्य नेतामहाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, अशी असा निर्णय झाला होता. त्यामुळे हे पद कोणाला द्यायचे याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा असला, तरी तिन्ही पक्षांना मान्य असेल असे नाव पुढे आणले जाईल. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी होते. पण पाडवी आदिवासी समाजाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाला राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोध करणार नाही. यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्याला विधानसभेचे सर्वोच्च पद दिले, असा संदेशही देता येईल अशी चर्चा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुखNana Patoleनाना पटोले