शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांना पालकमंत्री पदावरून हटवा; राज्यमंत्री बच्चू कडूंच्या पक्षाची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:59 IST

परभणीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. पालकमंत्री नवाब मलिकांना वेळ देण्यास लक्ष नाही. परभणीतील जनतेच्या हितासाठी आम्ही ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअडचणीच्या काळात प्रत्येक जण गावोगावी जाऊन मदत करतोय, परभणीत पालकमंत्र्यानी यावं इथं थांबावं प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात अशी अपेक्षा आहे आम्ही राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजकारणासाठी आम्ही ही मागणी करत आहोत.गेल्यावर्षीही कोविड काळात नवाब मलिक यांना परभणीकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता

परभणी - परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिकांना(Nawab Malik) हटवण्यात यावं अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केली आहे. याबाबत बोधने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. परभणी जिल्ह्याला पूर्णवेळ कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी शिवलिंग बोधने यांनी पत्रात केली आहे.

शिवलिंग बोधने म्हणाले की, नवाब मलिक हे राज्य सरकारमधील मोठे मंत्री आहेत. त्याचसोबत मलिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचीही मोठी जबाबदारी आहे. गेल्यावर्षीही कोविड काळात नवाब मलिक यांना परभणीकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. कधी जिल्ह्यात आले तर फक्त २ तासात आढावा घेऊन परत जातात. परभणीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. पालकमंत्री नवाब मलिकांना वेळ देण्यास लक्ष नाही. परभणीतील जनतेच्या हितासाठी आम्ही ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच अडचणीच्या काळात प्रत्येक जण गावोगावी जाऊन मदत करतोय, परभणीत पालकमंत्र्यानी यावं इथं थांबावं प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात अशी अपेक्षा आहे. पालक म्हणजे पालकाप्रमाणे जिल्ह्याची काळजी घ्यावी. आम्ही राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजकारणासाठी आम्ही ही मागणी करत आहोत. परभणी जिल्ह्याचे ऑक्सिजन सिलेंडर इतर जिल्हे पळवत आहेत पण पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा दावाही शिवलिंग बोधने यांनी पत्रातून केला आहे.

गुरुवारीच नवाब मलिकांनी केली होती कोविड रुग्णालयाची पाहणी

जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे असं पालकमंत्री नवाब मलिकांनी सांगितले होते. रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल अशीही माहिती नवाब मलिकांनी दिली होती.

कोरोनामुक्तीचा आकडा वाढला

चार दिवसांपासून परभणी जिल्हावासीयांना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे. दररोज ५०० ते ६०० रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. रविवारी तब्बल १ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. कोरोनामुक्तीचा आकडा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूnawab malikनवाब मलिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे