शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 14:11 IST

यूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा असल्या तरी पक्ष केवळ १०० जागांवर विजय मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ७ जागांवर विजय मिळवला. परंतु यावेळी जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस ताकद लावत आहेशनिवारी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुढील वर्षी २०२२ मध्ये यूपीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसही रणनीती आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी ३० वर्षांनी संघटनेचे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी गांधी कुटुंब महाराष्ट्र मॉडेलवर काम करत आहे.

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षाची निवड केली. पण त्याचसोबत ६ कार्यकारी अध्यक्ष बनवले होते. आता उत्तर प्रदेशातही काँग्रेस हीच रणनीती आखत आहे. काँग्रेसचे काही जण प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांच्यावर नाराज आहेत. अशा स्थितीत प्रियंका गांधी पक्षात गटबाजी नको यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्ष नाराज असलेल्या नेत्यांना आणि जातीय समीकरण साधण्याचा विचार करत आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा असल्या तरी पक्ष केवळ १०० जागांवर विजय मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरुन इतर पक्षांसोबत काँग्रेसची युती होऊ शकेल. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ७ जागांवर विजय मिळवला. परंतु यावेळी जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस ताकद लावत आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान

यूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत. १०० जागांवर निवडून येतील असे उमेदवार काँग्रेस शोधत आहेत. कारण १०० पैकी ८० जागांवर काँग्रेसला विजय मिळाला तरी त्यांच्या विना सरकार बनवणं कठीण होईल. शनिवारी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उमेदवारी तिकीटासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जासाठी ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिवसेना १०० जागा लढवणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा यू-टर्न; अवघ्या २४ तासांत ४०३ वरुन १०० जागांवर घसरण

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या( Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेने कितीही मोठी घोषणा केली तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. २०१७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आकडेवारी पाहिली तर शिवसेनेला राज्यात जनाधार नसल्याचं दिसून आलं आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ५७ जागा लढवल्या होत्या. त्यातील ५६ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. केवळ एका जागेवर डिपॉझिट वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर(Shivsena) आली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीShiv SenaशिवसेनाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक