शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते”; केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 17:22 IST

शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून, फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते, असे म्हटले आहे.

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना विरोधकांच्या बाकावर बसायला लागले. त्यानंतर पुन्हा एका आक्रमक होत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेकविध विषयांवर हल्लाबोल सुरू केला. ठाकरे सरकार पडेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता पुन्हा शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून, फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते, असे म्हटले आहे. (ramdas athawale taunt devendra fadnavis over chief minister post)

‘सन्मान देवदूतांचा’ या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युती आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद यांवर मिश्किल भाष्य केले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस यांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले, असे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थिती होते.

“अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सल्ला दिला होता. माझं जर ते म्हणणे फडणवीसांनी ऐकले असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असे सांगत, तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असेही त्यावेळी सांगितले होते, असे रामदास आठवले म्हणाले. 

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, कोरोना संकटाच्या कालावधीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तम काम केले. घरच्या कुटुंबाप्रमाणे राज्यातील जनतेची काळजी घेतली. विरोधक भाजपनेही टोपे यांच्यावर कधी टीका केली नाही, असे सांगत आठवले यांनी राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले