शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Farmers Protest: “शेतकरी आंदोलन २०२४ पर्यंत चालेल, निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 20:34 IST

Farmers Protest: हे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल, अशी आशा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल - राकेश टिकैतउत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला धडा शिकवू - राकेश टिकैतकृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत - राकेश टिकैत

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता सात महिने पूर्ण होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली असून, जोपर्यंत कृषी कायदे परत घेतले जात नाही, तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाहीत. हे आंदोलन २०२४ पर्यंतही चालेल, असा विश्वास आता आम्हाला वाटतोय, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. (rakesh tikait says otherwise farmers protest will continue till 2024)

एकंदरीत भूमिकेवरून आताचे केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेईल, असे वाटत नाही. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन २०२४ पर्यंत चालेल. निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू, असे इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला आहे. हे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल, अशी आशा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

आता आमने-सामनेची लढाई

आगामी कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. आता आमने-सामनेची लढाई लढण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधी कडवे आव्हान उभे करू, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यांपासून दिल्ली सीमा, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. काही झाले, तरी केंद्राने मंजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, कृषी कायद्यामध्ये योग्य ते बदल केले जातील. परंतु, ते मागे घेतले जाणार नाहीत, यावर ठाम आहे. 

गुड न्यूज! एका वर्षात विप्रोची दुसऱ्यांदा पगारवाढ; ८० टक्के कर्मचाऱ्यांना लाभ

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या कोणत्याही संघटनेशी किंवा नेत्यांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. कृषी कायदे मागे घेण्याची गोष्ट सोडल्यास कायद्याच्या कोणत्याही तरतुदींबाबत कोणत्याही शेतकरी संघटनेशी चर्चा केली जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर मध्यरात्रीही चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आली, तरी नरेंद्र सिंह तोमर त्यांचे स्वागतच करेल, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपा