शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Farmers Protest: “शेतकरी आंदोलन २०२४ पर्यंत चालेल, निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 20:34 IST

Farmers Protest: हे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल, अशी आशा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल - राकेश टिकैतउत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला धडा शिकवू - राकेश टिकैतकृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत - राकेश टिकैत

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता सात महिने पूर्ण होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली असून, जोपर्यंत कृषी कायदे परत घेतले जात नाही, तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाहीत. हे आंदोलन २०२४ पर्यंतही चालेल, असा विश्वास आता आम्हाला वाटतोय, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. (rakesh tikait says otherwise farmers protest will continue till 2024)

एकंदरीत भूमिकेवरून आताचे केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेईल, असे वाटत नाही. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन २०२४ पर्यंत चालेल. निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू, असे इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला आहे. हे सरकार नाही, तर पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल, अशी आशा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

आता आमने-सामनेची लढाई

आगामी कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. आता आमने-सामनेची लढाई लढण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधी कडवे आव्हान उभे करू, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यांपासून दिल्ली सीमा, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. काही झाले, तरी केंद्राने मंजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, कृषी कायद्यामध्ये योग्य ते बदल केले जातील. परंतु, ते मागे घेतले जाणार नाहीत, यावर ठाम आहे. 

गुड न्यूज! एका वर्षात विप्रोची दुसऱ्यांदा पगारवाढ; ८० टक्के कर्मचाऱ्यांना लाभ

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या कोणत्याही संघटनेशी किंवा नेत्यांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. कृषी कायदे मागे घेण्याची गोष्ट सोडल्यास कायद्याच्या कोणत्याही तरतुदींबाबत कोणत्याही शेतकरी संघटनेशी चर्चा केली जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर मध्यरात्रीही चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आली, तरी नरेंद्र सिंह तोमर त्यांचे स्वागतच करेल, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपा