शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Agriculture Bill: “आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 15:19 IST

Agriculture Bill: राज्य सरकारने विधेयक मागे घेतले नाही, तर याविरोधात राज्यात आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपटलावर ठेवलेले विधेयक तातडीने मागे घ्यावेराज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावाविधेयक मागे घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशपातळीप्रमाणे राज्यातही तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने केलेल्या नवी कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारच्या असलेल्या भूमिकेबद्दल विचारविनिमय करण्यात आला, तसेच पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवत ते मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. (raju shetti demand thackeray govt should withdraw the agriculture bill)

या बैठकीनंतर बोलताना शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मांडलेले कृषी विधेयक मागे घ्यावे. यापूर्वी राजस्थान, छत्तीसगड व पंजाब सरकारने अशाच पद्धतीने विधीमंडळात विधेयके मंजूर करून घेतली होती. मात्र, तिन्ही राज्याच्या राज्यपालांनी त्यावर अद्याप स्वाक्षरी केली नाही, असे नमूद करत मागील आठवड्यात आम्ही शेतकरी संघटनांच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शरद पवार यांना भेटलो होतो, असे शेट्टी म्हणाले.

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा

अशा प्रकारचे विधेयक मांडू नका, असे सांगूनही त्यांनी हे मांडले. केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्यापेक्षा ते कायदे बाजूला ठेवा व महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करा. जेणेकरून हे तिन्ही कायदे निष्रभ झाले पाहिजे. सर्वसाधारण शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा करावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली होती, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

हे कायदे सरसकट रद्द झाले पाहिजे

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादलेले आहेत. या देशातील धनदांडग्या लोकांसाठी कायदे केलेले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी नाहीत, अशी आरोप करत, देशभरातील सर्व संघटना एकत्रित येऊन या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत, येत्या २५ जुलै रोजी याला आठ महिने होत आहेत. केंद्र सरकार एवढे असंवेदनशील आहे की, ते आंदोलनाकडे लक्ष देण्यासही तयार नाही. हे कायदे सरसकट रद्द झाले पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

मुकेश अंबानी ‘ही’ कंपनी खरेदी करणार; ३ कोटी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेगा प्लान

दरम्यान, विधानसभेत या कायद्याला दुरुस्ती देऊन पटलावर ठेवण्याचे काम केलेले आहे, त्याला आमचा विरोध आहे. पटलावर ठेवलेले विधेयक तातडीने मागे घेतले गेले पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. राज्य सरकारने विधेयक मागे घेतले नाही, तर याविरोधात राज्यात आम्ही तीव्र आंदोलन करून, दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा निर्णय घेण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणagricultureशेतीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार