शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Bill: “आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 15:19 IST

Agriculture Bill: राज्य सरकारने विधेयक मागे घेतले नाही, तर याविरोधात राज्यात आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपटलावर ठेवलेले विधेयक तातडीने मागे घ्यावेराज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावाविधेयक मागे घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशपातळीप्रमाणे राज्यातही तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारने केलेल्या नवी कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारच्या असलेल्या भूमिकेबद्दल विचारविनिमय करण्यात आला, तसेच पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवत ते मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. (raju shetti demand thackeray govt should withdraw the agriculture bill)

या बैठकीनंतर बोलताना शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मांडलेले कृषी विधेयक मागे घ्यावे. यापूर्वी राजस्थान, छत्तीसगड व पंजाब सरकारने अशाच पद्धतीने विधीमंडळात विधेयके मंजूर करून घेतली होती. मात्र, तिन्ही राज्याच्या राज्यपालांनी त्यावर अद्याप स्वाक्षरी केली नाही, असे नमूद करत मागील आठवड्यात आम्ही शेतकरी संघटनांच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शरद पवार यांना भेटलो होतो, असे शेट्टी म्हणाले.

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा

अशा प्रकारचे विधेयक मांडू नका, असे सांगूनही त्यांनी हे मांडले. केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्यापेक्षा ते कायदे बाजूला ठेवा व महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करा. जेणेकरून हे तिन्ही कायदे निष्रभ झाले पाहिजे. सर्वसाधारण शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा करावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली होती, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

हे कायदे सरसकट रद्द झाले पाहिजे

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादलेले आहेत. या देशातील धनदांडग्या लोकांसाठी कायदे केलेले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी नाहीत, अशी आरोप करत, देशभरातील सर्व संघटना एकत्रित येऊन या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत, येत्या २५ जुलै रोजी याला आठ महिने होत आहेत. केंद्र सरकार एवढे असंवेदनशील आहे की, ते आंदोलनाकडे लक्ष देण्यासही तयार नाही. हे कायदे सरसकट रद्द झाले पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

मुकेश अंबानी ‘ही’ कंपनी खरेदी करणार; ३ कोटी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेगा प्लान

दरम्यान, विधानसभेत या कायद्याला दुरुस्ती देऊन पटलावर ठेवण्याचे काम केलेले आहे, त्याला आमचा विरोध आहे. पटलावर ठेवलेले विधेयक तातडीने मागे घेतले गेले पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. राज्य सरकारने विधेयक मागे घेतले नाही, तर याविरोधात राज्यात आम्ही तीव्र आंदोलन करून, दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा निर्णय घेण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणagricultureशेतीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार