शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत तर भाजपाला आशेचा नवा किरण

By प्रविण मरगळे | Updated: February 1, 2021 08:19 IST

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते

ठळक मुद्देएकूण ९० पंचायतीचा निकाल पाहिला तर भाजपाला १ हजार १४० जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेस १ हजार १९७ जागांवर विजयी झालीमतांची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसपेक्षा जास्त मतदान भाजपाला झालं आहेअपक्षांच्या पाठिंब्यावर आम्ही ५० पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आणू, प्रदेशाध्यक्षांचा दावा

जयपूर – राजस्थानच्या २० जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमधील ३ हजार ३३४ जागांवरचे निकाल घोषित झाले आहेत. यातील ९० पंचायतीपैकी भारतीय जनता पार्टीला २४ पंचायतीत पूर्ण बहुमत मिळालं आहे, तर १९ ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. ५ पंचायतीवर दोन्ही पक्षाला समसमान जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी अपक्ष विजयी उमेदवारांची संख्या जास्त आहे. यातील अनेक अपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस सत्तेचं समीकरण गाठण्याची तयारी करत आहे.

राजस्थानच्या स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण २९ लाख मतदार आहेत, त्यातील २२ लाख मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान केले होते, त्यात काँग्रेसला ७ लाख ८५ हजार २८२ मतं मिळाली तर भाजपाला ७ लाख ६५ हजार ३६३ मतं मिळाली, उर्वरित ६ लाख ८७ हजार २१९ मतं अपक्षांच्या पारड्यात गेली. एकूण ९० पंचायतीचा निकाल पाहिला तर भाजपाला १ हजार १४० जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेस १ हजार १९७ जागांवर विजयी झाली आहे. अपक्ष उमेदवारांना ६९३ जागा मिळाल्या आहेत.

अपक्ष उमेदवारांनी नोखा आणि निवाई या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जाणं पसंत केले आहे. तर भिंडरमध्ये जनता सेनेसोबत गेले आहेत. हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला मुंडवा येथे बहुमत मिळालं आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसपेक्षा जास्त मतदान भाजपाला झालं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, पक्षाने मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी दावा केला आहे की, अपक्षांच्या पाठिंब्यावर आम्ही ५० पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आणू. काँग्रेसच्या रणनीतीनुसार अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते, जे निवडणुकीत जिंकून आले आहेत. ते काँग्रेसचेच आहेत. तर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलंय की, राजस्थानच्या जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे. हे ९० पंचायती निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होतं. आता बेरजेचं गणित करून काँग्रेस सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.

लक्ष्मणगड नगरपालिकेवर सर्वांची नजर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लक्ष्मणगड नगरपालिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, यात काँग्रेस अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणार आहे, येथे एकूण ४० वार्ड आहेत. ज्यात काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी १४ जागांवर विजय मिळाला आहे. तर ११ वार्डात अपक्ष आणि एकाठिकाणी माकपा उमेदवाराचा विजय झाला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा