शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 09:06 IST

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशनंतर भाजपाचा मोर्चा राजस्थानच्या दिशेनेकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या हालचाली, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा आरोपसचिन पायलट आणि समर्थक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला लावली गैरहजेरी

नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील केल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं. आता भाजपानेराजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहे. शनिवारी राजस्थानमधील राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्यावेळी सचिन पायलट दिल्लीत होते त्यावेळी या चर्चांना उधाण आलं. इतकचं नाही तर शनिवारी रात्री राजस्थानमधील २४ आमदार हरियाणातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहचले. मध्य प्रदेशात ज्याप्रकारे शिंदे समर्थक आमदारांना हरियाणा आणि कर्नाटकात एका रिसोर्टमध्ये नेलं होतं तशीच स्थिती राजस्थानमध्ये होताना दिसत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्त्वाचे सदस्य सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये  घडणाऱ्या घडामोडीतून सचिन पायलट हेदेखील भाजपाच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाकडून आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला असता अनेक आमदारांनी फोन स्विचऑफ केल्याचं आढळलं. काँग्रेसचे महासचिव आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे शनिवारी जयपूरला पोहचले आहेत.

वेगवान राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रात्री उशिरा मंत्र्यांची बैठक बोलावली. (Rajasthan Politics) ज्यात सचिन पायलट आणि समर्थक मंत्री गैरहजर होते, सचिन पायलट हे दिल्लीला असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असं सांगण्यात आलं. पण प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने सुरुवातीपासून सचिन पायलट नाराज असल्याचं दिसून आलं होतं.

सरकार स्थिर, पाच वर्षे टिकणार : गेहलोत

पोलिसांनी केलेल्या या कारवाईची माहिती उघड होताच सरकार पाडण्याचे हे कारस्थान भाजपा करत असल्याचा आरोप करणारे पत्रक काँग्रेसच्या २० आमदारांनी जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाच आरोप उघडपणे केला. ते म्हणाले की, कोरोनाची महामारी सुरु असताना सरकार पाडण्याचे हे उद्योग करणे हे भाजपाला माणुसकीची जराही चाड नसल्याचेच द्योतक आहे. परंतु आमचे सरकार भक्कम आहे, ते यापुढेही भक्कम राहील व पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड व प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश पूनिया त्यांच्या दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरून हे उद्योग करत आहेत, असा थेट आरोप गेहलोत यांनी केला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशRahul Gandhiराहुल गांधी