शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनसेची मोर्चेबांधणी! २४ तासांत राज ठाकरेंनी केली डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती

By प्रविण मरगळे | Updated: February 2, 2021 15:15 IST

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात डोंबिवलीचा काही भाग येत असल्याने मंदार हळबे आणि राजेश कदम यांच्या पक्ष सोडण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेला जोरदार धक्के बसले आहेत. सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, त्यापाठोपाठ मनसेचे गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही मनसेला रामराम केला, कदम आणि हळबे यांच्या पक्ष सोडण्याने मनसेला डोंबिवलीत मोठं खिंडार पडल्याचं चित्र निर्माण झालं.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात डोंबिवलीचा काही भाग येत असल्याने मंदार हळबे आणि राजेश कदम यांच्या पक्ष सोडण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राजेश कदम हे मनसेचे संस्थापक सदस्य होते, अनेक आंदोलनात त्यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात भूमिका घेत रस्त्यावर उतरले होते, मात्र सोमवारी अचानक राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितले.

प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

तर दुसरीकडे मंदार हळबे यांनीही मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, मंदार हळबे यांना मनसेने दोनदा विधानसभेचे तिकीट दिलं होतं, यंदाच्या निवडणुकीत मनसे उमेदवार मंदार हळबे यांना ४५ हजार मतदान झालं होतं, मंदार हळबे हे मनसेचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. मंदार हळबेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे कंडोमपा निवडणुकीत मनसेला जोरदार फटका बसला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली, यात आमदार राजू पाटील यांचीही उपस्थिती होती, यावेळी मनोज घरत यांना मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले.

'...म्हणून मी भाजपात प्रवेश केला'; मनसेच्या नगरसेवकाने सांगितली अखेर 'मन की बात'

काय म्हणाले मंदार हळबे?

मी लहानपणापासून भाजपासाठी काम केलं आहे. तसेच मला राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी सांगितलं. तसेच १० वर्षे ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असंही मंदार हळबे यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.

तर राजकीय आमिषापोटी राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरे