शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:32 IST

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला टाटा करत आज भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Why Jitin Prasad left congress? because of Priyanka Gandhi.)

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितिन यांना ओळखले जाते. परंतू प्रियंका गांधी यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्य़े राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली तेव्हाच जितिन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितिन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजुला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पाय़लट आणि जितिन प्रसाद असे काही मोजकेच तरुण नेते गांधी घराण्याच्या जवळ होते.  उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन असायचे. 

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरु होती. मात्र, प्रियंका यांनी जितिनना बाजुला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. जितिन यांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालचा निवडणूक प्रभारी म्हणून पाठविले होते. या साऱ्या प्रकारामुळे जितिन प्रसाद नाराज होते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा