शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:32 IST

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला टाटा करत आज भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Why Jitin Prasad left congress? because of Priyanka Gandhi.)

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितिन यांना ओळखले जाते. परंतू प्रियंका गांधी यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्य़े राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली तेव्हाच जितिन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितिन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजुला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पाय़लट आणि जितिन प्रसाद असे काही मोजकेच तरुण नेते गांधी घराण्याच्या जवळ होते.  उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन असायचे. 

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरु होती. मात्र, प्रियंका यांनी जितिनना बाजुला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. जितिन यांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालचा निवडणूक प्रभारी म्हणून पाठविले होते. या साऱ्या प्रकारामुळे जितिन प्रसाद नाराज होते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा