शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:32 IST

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला टाटा करत आज भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Why Jitin Prasad left congress? because of Priyanka Gandhi.)

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितिन यांना ओळखले जाते. परंतू प्रियंका गांधी यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्य़े राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली तेव्हाच जितिन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितिन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजुला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पाय़लट आणि जितिन प्रसाद असे काही मोजकेच तरुण नेते गांधी घराण्याच्या जवळ होते.  उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन असायचे. 

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरु होती. मात्र, प्रियंका यांनी जितिनना बाजुला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. जितिन यांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालचा निवडणूक प्रभारी म्हणून पाठविले होते. या साऱ्या प्रकारामुळे जितिन प्रसाद नाराज होते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा