शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:57 IST

दोनवेळा खेद व्यक्त केल्यानंतर मागितली माफी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. चौकीदार चोर है प्रकरणात राहुल गांधींनी तिसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. याआधीच्या दोन प्रतिज्ञापत्रात त्यांनी खेद व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. यावर न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)राफेल डील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना 'आता सर्चोच्च न्यायालयदेखील म्हणतंय चौकीदार चोर है,' अशी प्रतिक्रिया देत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपानं तीव्र आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयानं असं कोणतंही विधान केलेलं नाही. तरीही राहुल गांधी असं विधान करुन न्यायालयाचा अवमान करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राहुल यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. न्यायालयानं 30 एप्रिलला राहुल यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. राहुल गांधींनी शपथपत्रात त्यांची चूक कबूल केली. आपण चुकीच्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या नावानं भाष्य केल्याचं राहुल यांनी शपथपत्रात म्हटलं. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं शपथपत्र तीन पानांचं आहे. याआधीच्या दोन शपथपत्रांमध्ये खेद करणाऱ्या राहुल यांनी तिसऱ्या शपथपत्रात न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. आपण न्यायालायाची माफी मागत असून पंतप्रधान मोदी किंवा भाजपाची माफी मागत नसल्याचं राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय