शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

पक्ष बळकट झाला तरच राहुल गांधी पंतप्रधान; ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 2:15 AM

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीपासून ते सगळ्या पदांसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत पक्ष बळकट होणार नाही. पक्ष बळकट होईल तेव्हाच राहुल गांधी पंतप्रधान होणे शक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हाच मुद्दा उपस्थित केल्यावर ज्या लोकांना जनाधार नाही तेच याला विरोध करीत आहेत. ते लोक फक्त लाळघोटेपणा करून पदावर राहू इच्छितात.’’

आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला. त्या हंगामी अध्यक्ष होत्या त्यामुळे प्रदीर्घ काळ त्या पदावर राहू शकत नाहीत. राहुल गांधी अध्यक्ष होऊ इच्छित नाहीत त्यामुळे आम्ही पूर्णवेळ अध्यक्ष असावी, अशी मागणी केली.’’

पक्षातील राहुल गांधी यांचे समर्थन करणाऱ्या युवक नेत्यांवर थेट हल्ला करताना आझाद यांनी या मंडळींनी पक्षासाठी काय काम केले? असा प्रश्न विचारला. आम्ही या पक्षासाठी राजीव गांधी, सीताराम केसरी, पी. व्ही. नरसिंह राव आणि इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम केले आणि संघटनेच्या निवडणुकाही पाहिल्या. परंतु, ३० वर्षांपासून निवडणूका झालेल्याच नाहीत. आमची मागणी आहे की, गटापासून जिल्हा, जिल्ह्यापासून प्रदेश आणि प्रदेशापासून केंद्रीय स्तरावर थेट निवडणुका व्हाव्यात. पूर्णवेळचा अध्यक्ष असावा. आम्ही बळकट होऊन भाजपला टक्कर देऊ शकू, असेही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद यांचा आक्रमकपणा हे दाखवत होता की, हा संघर्ष राहुल गांधींचे पाठीराखे व जुन्या नेत्यांमधील असून तो असा सहज संपणारा नाही. २३ नेत्यांनी लिहिलेले पत्र आझाद यांना कोणत्याच दृष्टिकोनातून चुकीचे वाटत नाही. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, राहुल गांधींचे समर्थक लाळघोटेपणा करून पदांवर राहू इच्छितात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस