शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:47 IST

न्याय योजनेची घोषणा करताना राहुल गांधींची चूक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्याला काँग्रेसनं 'जन आवाज' असं नाव दिलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनामा पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर 'हम निभाएंगे' असं लिहिण्यात आलं आहे. काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा उल्लेख केला. याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना राहुल गांधींकडून एक चूक झाली. गरिबीवर वार म्हणण्याऐवजी ते चुकून गरिबांवर वार असं म्हणाले. राहुल गांधींनी न्याय योजनेसह काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी न्याय योजनेवर भाष्य करताना राहुल गांधी गडबडले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 30 हजार कोटी रुपये उद्योगपतींना देऊ शकतात, तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. 72 हजार गरिबांवर वार, 72000,' असं राहुल म्हणाले. आपल्याला गरिबीवर वार करायचा आहे, असं राहुल गांधींना म्हणायचं होतं. मात्र चुकून ते गरिबांवर वार असं म्हणून गेले. विशेष म्हणजे राहुल गांधींना त्यांची चूक लक्षातच आली नाही. ते यानंतरही बोलतच होते. त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंदेखील दिली. पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील प्रश्न विचारायला हवेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी पत्रकार परिषद घेण्यास का घाबरतात, असा प्रश्न पत्रकारांनी मोदींना विचारायला हवा, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेसोबतच इतर चार मुद्द्यांवरही भाष्य केलं. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजनेसह रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी