शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

भिवंडी मतदारसंघात यंत्रमाग कामगारांचे प्रश्नच निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:33 IST

एमआयएम, सपाकडेही लक्ष; शिवसेनेची गणिते युतीवर अवलंबून

- पंढरीनाथ कुंभारडहाणू मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर २००९ मध्ये भिवंडी मतदारसंघ उदयास आला. डहाणू मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. फेररचनेत इतर नवीन क्षेत्रांचा सहभाग झाल्यानंतरही काँग्रेसनेभिवंडी लोकसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवत, तेव्हाचे उमेदवार सुरेश टावरे यांना निवडून आणले होते. त्यात भिवंडीतील मतदारांची भूमिका निर्णायक होती.२०१४ च्या निवडणुकीत भाजपा-सेना युतीने राष्ट्रवादीतून आलेले स्थानिक उमेदवार कपिल पाटील यांना संधी दिली. भिवंडीबाहेरील विश्वनाथ पाटील यांना दिलेली उमेदवारी आणि मोदी लाट असा दुहेरी फटका काँग्रेसला बसला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन महापालिका आणि एका नगरपालिकेचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा येथील यंत्रमाग उद्योगाला प्रचंड फटका बसला. अनेक कामगार देशोधडीला लागले. त्यामुळे यंत्रमाग व्यावसायिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करीत आहेत. पण घोषणाबाजीपलीकडे त्यात यश आलेले नाही. या नाराजीचा फायदा कोण उठवू शकतो, त्यावर येथील कौल अवलंबून आहे.कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो, यावर पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत. भारिप-बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर केलेल्या युतीतील भिवंडी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. समाजवादी पक्षाची दोन्ही काँग्रेसशी आघाडी झाली, तर तो पक्ष मुस्लीम उमेदवारासाठी प्रयत्नशील आहे.येथील मुस्लीम मतदारांनी आजवर काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. मागील निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या आरोपामुळे त्यांच्यावर स्थानिक कोर्टात खटला भरण्यात आला. त्या याचिकेच्या सुनावणीनिमित्ताने साडेचार वर्षांत ते भिवंडीत वरचेवर आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसमधून आता प्रदीप रांका, माजी खासदार सुरेश टावरे, विश्वनाथ पाटील, राकेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार योगेश पाटील हे उत्सुक आहेत.युती झाल्यास मतदारसंघावरील भाजपाचा दावा कायम असेल. शिवसेनेची नाराजी कायम असल्याने युती न झाल्यास सुरेश (बाळामामा) म्हात्रे व प्रकाश पाटील उत्सुक आहेत. खा. कपिल पाटील यांनी चांगली कामगिरी केली. परंतु यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यात कमी पडले. अनेक प्रयत्नांनंतरही वस्त्रोद्योग मालकांचे, कामगारांचे प्रश्न म्हणावे तसे सुटलेले नाहीत. याचा फटका भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी पालिकेतील काँग्रेसच्या नकारात्मक कारभाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.भिवंडीतील मतदारएकूण मतदार- 17,85,952पुरुष- 9,87,431महिला- 7,98,411सध्याची परिस्थितीयंत्रमाग उद्योग डबघाईला आल्याने चिंतित व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे या निवडणुकीत निर्णायक मतदान.भिवंडी महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस आणि शिवसेना खूप जवळ आले. सत्ता स्थापनेवेळी फोडाफोडीच्या भाजपाच्या प्रयत्नांना दोघांनी एकत्र विरोध केला. ती मैत्री लोकसभेत कशी राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.कल्याण, बदलापूरच्या शहरी मतदारांपेक्षा काँग्रेस, भाजपा नेत्यांनी मुरबाड, शहापूरच्या मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत बसला.भिवंडीतील मुस्लिम मतदार, ग्रामीण भागातील कुणबी, आगरी मतदारांचा विचार करून जो पक्ष उमेदवार देईल त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेकपिल पाटील (भाजपा)- 4,11,070विश्वनाथ पाटील (काँग्रेस)- 3,01,620सुरेश (बाळा मामा) म्हात्रे (मनसे)- 93,647अन्सारी सत्तार (बीएसपी)- 14,068मधुकर विठ्ठल पाटील (सीपीआय)- 13,720

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना