शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मतदारसंघात यंत्रमाग कामगारांचे प्रश्नच निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:33 IST

एमआयएम, सपाकडेही लक्ष; शिवसेनेची गणिते युतीवर अवलंबून

- पंढरीनाथ कुंभारडहाणू मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर २००९ मध्ये भिवंडी मतदारसंघ उदयास आला. डहाणू मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. फेररचनेत इतर नवीन क्षेत्रांचा सहभाग झाल्यानंतरही काँग्रेसनेभिवंडी लोकसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवत, तेव्हाचे उमेदवार सुरेश टावरे यांना निवडून आणले होते. त्यात भिवंडीतील मतदारांची भूमिका निर्णायक होती.२०१४ च्या निवडणुकीत भाजपा-सेना युतीने राष्ट्रवादीतून आलेले स्थानिक उमेदवार कपिल पाटील यांना संधी दिली. भिवंडीबाहेरील विश्वनाथ पाटील यांना दिलेली उमेदवारी आणि मोदी लाट असा दुहेरी फटका काँग्रेसला बसला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन महापालिका आणि एका नगरपालिकेचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा येथील यंत्रमाग उद्योगाला प्रचंड फटका बसला. अनेक कामगार देशोधडीला लागले. त्यामुळे यंत्रमाग व्यावसायिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करीत आहेत. पण घोषणाबाजीपलीकडे त्यात यश आलेले नाही. या नाराजीचा फायदा कोण उठवू शकतो, त्यावर येथील कौल अवलंबून आहे.कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो, यावर पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत. भारिप-बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर केलेल्या युतीतील भिवंडी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. समाजवादी पक्षाची दोन्ही काँग्रेसशी आघाडी झाली, तर तो पक्ष मुस्लीम उमेदवारासाठी प्रयत्नशील आहे.येथील मुस्लीम मतदारांनी आजवर काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. मागील निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या आरोपामुळे त्यांच्यावर स्थानिक कोर्टात खटला भरण्यात आला. त्या याचिकेच्या सुनावणीनिमित्ताने साडेचार वर्षांत ते भिवंडीत वरचेवर आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसमधून आता प्रदीप रांका, माजी खासदार सुरेश टावरे, विश्वनाथ पाटील, राकेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार योगेश पाटील हे उत्सुक आहेत.युती झाल्यास मतदारसंघावरील भाजपाचा दावा कायम असेल. शिवसेनेची नाराजी कायम असल्याने युती न झाल्यास सुरेश (बाळामामा) म्हात्रे व प्रकाश पाटील उत्सुक आहेत. खा. कपिल पाटील यांनी चांगली कामगिरी केली. परंतु यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यात कमी पडले. अनेक प्रयत्नांनंतरही वस्त्रोद्योग मालकांचे, कामगारांचे प्रश्न म्हणावे तसे सुटलेले नाहीत. याचा फटका भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी पालिकेतील काँग्रेसच्या नकारात्मक कारभाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.भिवंडीतील मतदारएकूण मतदार- 17,85,952पुरुष- 9,87,431महिला- 7,98,411सध्याची परिस्थितीयंत्रमाग उद्योग डबघाईला आल्याने चिंतित व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे या निवडणुकीत निर्णायक मतदान.भिवंडी महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस आणि शिवसेना खूप जवळ आले. सत्ता स्थापनेवेळी फोडाफोडीच्या भाजपाच्या प्रयत्नांना दोघांनी एकत्र विरोध केला. ती मैत्री लोकसभेत कशी राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.कल्याण, बदलापूरच्या शहरी मतदारांपेक्षा काँग्रेस, भाजपा नेत्यांनी मुरबाड, शहापूरच्या मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत बसला.भिवंडीतील मुस्लिम मतदार, ग्रामीण भागातील कुणबी, आगरी मतदारांचा विचार करून जो पक्ष उमेदवार देईल त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेकपिल पाटील (भाजपा)- 4,11,070विश्वनाथ पाटील (काँग्रेस)- 3,01,620सुरेश (बाळा मामा) म्हात्रे (मनसे)- 93,647अन्सारी सत्तार (बीएसपी)- 14,068मधुकर विठ्ठल पाटील (सीपीआय)- 13,720

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना