शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम वलय बाजूला ठेवून जमिनीवर या, आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 23:41 IST

Ashish Shelar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे

सावंतवाडी - कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे त्यानी नुसती वातावरण निर्मिती केली आहे शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे अन्यथा त्यांना येथील जनता  येणाऱ्या निवडणुकीत जमिनीवर आणेल अशी टीका माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांच्या सुरक्षित केलेली कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय असल्याची टिका ही  त्यांनी यावेळी केली.भाजपा नेता आशिष शेलार हे रविवारी सावंतवाडी आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अॅड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे त्यामुळे माझ्यासह सह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही फक्त कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकारने केलेले कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे मात्र पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हेच अपेक्षित आहे आणि आमचेही असेच म्हणणे आहे त्यामुळे याच भूमिकेतून त्यांनी जर कपात केली असेल तर टीका करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.मुंबईमध्ये शिवसेनेने गुजराती लोकांसाठी घेतलेले मिळावे यामुळे मुंबईत भाजपाला तोटा होणार का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेच्या भेसळयुक्त हिंदुत्व वादामुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न मुंबईची जनता आणून पडणार असून येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर सुनेला धडा शिकवतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेने आगीशी खेळू नये..राज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायच आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचं असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता मात्र राज्य सरकार दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आगीशी खेळू नये आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSawantwadiसावंतवाडी