शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

कृत्रिम वलय बाजूला ठेवून जमिनीवर या, आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 23:41 IST

Ashish Shelar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे

सावंतवाडी - कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे त्यानी नुसती वातावरण निर्मिती केली आहे शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे अन्यथा त्यांना येथील जनता  येणाऱ्या निवडणुकीत जमिनीवर आणेल अशी टीका माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांच्या सुरक्षित केलेली कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय असल्याची टिका ही  त्यांनी यावेळी केली.भाजपा नेता आशिष शेलार हे रविवारी सावंतवाडी आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अॅड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे त्यामुळे माझ्यासह सह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही फक्त कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकारने केलेले कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे मात्र पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हेच अपेक्षित आहे आणि आमचेही असेच म्हणणे आहे त्यामुळे याच भूमिकेतून त्यांनी जर कपात केली असेल तर टीका करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.मुंबईमध्ये शिवसेनेने गुजराती लोकांसाठी घेतलेले मिळावे यामुळे मुंबईत भाजपाला तोटा होणार का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेच्या भेसळयुक्त हिंदुत्व वादामुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न मुंबईची जनता आणून पडणार असून येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर सुनेला धडा शिकवतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेने आगीशी खेळू नये..राज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायच आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचं असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता मात्र राज्य सरकार दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आगीशी खेळू नये आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSawantwadiसावंतवाडी