शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 18:31 IST

Coronavirus: PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रियंका गांधींचा योगी सरकारवर निशाणाPM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाहीकोरोनामुळे झालेला त्रास सहन युपीवासी कधीच विसरू शकणार नाही

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांना निर्बंध लावण्याबाबतचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे. यातच कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, काँग्रेसने योगी सरकारवर निशाणा साधला आहे. PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. (priyanka gandhi says pm modi certificate cannot hide yogi govt mismanagement in corona situation)

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशीतील माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, कोरोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटे आली. कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसह संपूर्ण उत्तर प्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. 

योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!

योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, वाराणसीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी, माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांना समजले आहे की, ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे, असे म्हटले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसPoliticsराजकारण