शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राष्ट्रवादी विधानसभेसाठी तयार : मंगळवारपासून तीन दिवस मुलाखती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार दि. २३ ते २५ या तीन दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पुण्यातील घरी छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये २८८ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून आलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे ८०० अर्ज आले आहेत. प्रत्येक जागेचा तपशील बारकाईने अभ्यासण्यात आला. तेथील पक्षाच्या ताकदीची माहिती घेण्यात आली. आता विधानसभानिहाय सर्व नेत्यांकडे  मुलाखतींची जबाबदारी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्याबाबत चर्चा झालेली नाही. काँग्रेसबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. पक्षाचे नेते, मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असे पाटील यांनी नमुद केले.काँग्रेस व मित्रपक्षातील जागावाटपाविषयी बोलताना पाटील म्हणाले, जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये २२० जागांपर्यंतचे निर्णय होऊ शकतात. राज ठाकरे यांच्या आघाडीतील सहभागाबद्दल अद्याप चर्चा झाली नाही. त्यांच्याबाबत काँग्रेस किती अनुकूल आहे, याची माहिती नाही.प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही पक्षांकडून पत्र पाठविले आहे. धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

नेत्यांना सत्तेची मस्तीचंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा व शिवसेनेतील नेत्यांकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आघाडीच्या २० जागा निवडून येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावर टीका करताना पाटील म्हणाले, मोजायची सवय असणाºयांकडून अपेक्षा काय करायची. सत्तारूढ नेत्यांना किती मस्ती आहे, हे यावरून दिसते. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींना मते दिली. हे आपल्याच मते दिल्याच्या अविर्भावात आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील