शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

राष्ट्रवादी विधानसभेसाठी तयार : मंगळवारपासून तीन दिवस मुलाखती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार दि. २३ ते २५ या तीन दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पुण्यातील घरी छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये २८८ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून आलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे ८०० अर्ज आले आहेत. प्रत्येक जागेचा तपशील बारकाईने अभ्यासण्यात आला. तेथील पक्षाच्या ताकदीची माहिती घेण्यात आली. आता विधानसभानिहाय सर्व नेत्यांकडे  मुलाखतींची जबाबदारी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्याबाबत चर्चा झालेली नाही. काँग्रेसबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. पक्षाचे नेते, मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असे पाटील यांनी नमुद केले.काँग्रेस व मित्रपक्षातील जागावाटपाविषयी बोलताना पाटील म्हणाले, जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये २२० जागांपर्यंतचे निर्णय होऊ शकतात. राज ठाकरे यांच्या आघाडीतील सहभागाबद्दल अद्याप चर्चा झाली नाही. त्यांच्याबाबत काँग्रेस किती अनुकूल आहे, याची माहिती नाही.प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही पक्षांकडून पत्र पाठविले आहे. धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

नेत्यांना सत्तेची मस्तीचंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा व शिवसेनेतील नेत्यांकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आघाडीच्या २० जागा निवडून येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावर टीका करताना पाटील म्हणाले, मोजायची सवय असणाºयांकडून अपेक्षा काय करायची. सत्तारूढ नेत्यांना किती मस्ती आहे, हे यावरून दिसते. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींना मते दिली. हे आपल्याच मते दिल्याच्या अविर्भावात आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील