शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 9:46 PM

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देभाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव : भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या आठ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद असा नारा दिला जात आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी भाजपाला लगावला.

गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा विषयांवर मते मांडली. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला.

दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट राज्य सरकार सांगत नाही, विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे. भाजपला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत.

कितीही टीका केली तरी आमचे सरकार पाच वर्षे काम करणारभाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

दसरा मेळावा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणारशिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होईल, याचा निर्णय येत्या काही दिवसात होईल, असे आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. हा मेळावा कशा पद्धतीने होईल, हे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे सत्ताराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्षभरापूर्वी सातारा येथे भरपावसात जाहीर सभा झाली होती. वयाने ज्येष्ठ असल्याने नेत्याने अशा पद्धतीने सभा घेतल्याने त्यावेळी जनतेची सहानुभूती देखील मिळाली होती. ही सभा अविस्मरणीय होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील अशाच पद्धतीने सभा झाली होती, अशी आठवण सांगत गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रयत्नानेच आजची ही सत्ता असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार