शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 21:47 IST

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देभाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव : भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या आठ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद असा नारा दिला जात आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी भाजपाला लगावला.

गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा विषयांवर मते मांडली. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला.

दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट राज्य सरकार सांगत नाही, विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे. भाजपला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत.

कितीही टीका केली तरी आमचे सरकार पाच वर्षे काम करणारभाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

दसरा मेळावा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणारशिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होईल, याचा निर्णय येत्या काही दिवसात होईल, असे आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. हा मेळावा कशा पद्धतीने होईल, हे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे सत्ताराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्षभरापूर्वी सातारा येथे भरपावसात जाहीर सभा झाली होती. वयाने ज्येष्ठ असल्याने नेत्याने अशा पद्धतीने सभा घेतल्याने त्यावेळी जनतेची सहानुभूती देखील मिळाली होती. ही सभा अविस्मरणीय होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील अशाच पद्धतीने सभा झाली होती, अशी आठवण सांगत गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रयत्नानेच आजची ही सत्ता असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार