शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कुरघोडीच्या राजकारणाने माढ्याचा फड रंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:34 IST

माढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

- समीर इनामदारमाढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.राष्टÑवादी काँग्रेसकडून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर रिंगणात आहेत.संजय शिंदे यांना माढा वगळता इतर तालुक्यांत मताधिक्य मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणास संजय शिंदे यांनी विरोध केल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध प्रचारास प्रारंभ केला आहे.त्याच वेळी संजय शिंदे आपण पाण्याच्या बाजूने आहोत, आपला विरोध नाही, हे सांगताना दिसत आहेत.संजय शिंदे यांच्याकडून आ. गणपतराव देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे यांनी प्रचारास जोर लावला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून आ. प्रशांत परिचारक, आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, आ. नारायण पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, कल्याणराव काळे यांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे.दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वैयक्तिक आरोपांची राळ उडविली जात आहे. काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी राष्टÑवादीचा प्रचारकरण्यास नकार दिल्याने संजय शिंदे यांची गोची झाली आहे. एकेकाळचे मित्र आता राजकारणात शत्रू बनल्याचे या निवडणुकीतून दिसून आलेआहे. शरद पवार, अजित पवार यांनीही संजय शिंदे यांच्यासाठी सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर त्याचा अधिक फायदाहोईल, अशी अपेक्षा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आहे.वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे हेदेखील लढतीत आहेत. तेकिती मते मिळवितात, यावर बरेच अवलंबून आहे.>सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षांपासून माढा लोकसभा मतदारसंघात काम करीत आहोत. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्याचा फायदा आम्हाला होईल.- संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस>आमची लढाई संजय शिंदे यांच्याविरुद्ध नसून, बारामतीच्या शरद पवारांविरुद्ध आहे. या भागातील सिंचन, पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आला. याची दखल मतदार निश्चितपणे घेतील.- रणजितसिंह निंबाळकर,भाजप>कळीचे मुद्देपाणी, सिंचनाचे प्रश्न, ऊसदर हे मुख्य मुद्दे आहेत. रखडलेल्या प्रकल्पांवर अधिक भर.मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते भाजपकडे. पाण्याच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरण्याची तयारी.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019madha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर