शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिवंडी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून राजकारण तापले; आयुक्तांनी दिले स्थगितीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 15:30 IST

Bhiwandi Municipal Corporation : मनपात भाजपाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्यापासून भाजपसह काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे.

- नितिन पंडीत 

भिवंडी : काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही महापौर पद कोणार्क विकास आघाडीकडे आल्यापासून भिवंडी शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. यातच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच मनपात भाजपाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्यापासून भाजपसह काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे. 

महापौरांनी महासभेत केलेली विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार नगर विकास मंत्र्यांकडे केल्यानंतर नगर विकास मंत्र्यांच्या आदेशाने मनपा आयुक्तांनी विरोधी पक्षनेते पदास स्थगिती दिली आहे. यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. शहर विकास वगळता नेहमी या-ना-त्या राजकीय विषयात चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेच्या विरोध पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक मतलूब अफजल खान उर्फ मतलूब सरदार यांची नियुक्ती २२ जानेवारी राजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली होती. 

मतलूब सरदार यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेत थेट राज्याचे नगरविकास मंत्री यांच्याकडे या नियुक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नगर विकास मंत्र्यांनी महापालिकेत महापौरांनी महासभेत केलेली मतलूब खान यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीस स्थगिती दिल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी देखील ही नियुक्ती स्थगित केल्याचे निर्देश प्रशासनासह खान यांना दिले आहे. तर पुनर्नियुक्तीसाठी आता राष्ट्रवादीच्या गोताणे वरिष्ठांकडे धाव घेतली असून त्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. 

२२ जानेवारी रोजी झालेली महासभा रद्द केल्याने त्यासभेत झालेले इतर विषय रद्द केले मग विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीचा विषय कसा मंजूर होऊ शकतो यावर आपण आक्षेप घेतला होता आता महापौरांनी पुन्हा विरोधी पक्षनेते पद जे आमच्याकडे होते ते पुन्हा नियुक्त करावे, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी दिली आहे.   

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे