शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:35 IST

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीतील या बैठकीत मुफ्ती यांनी पाकिस्तानबाबत अवाक्षर काढले नसल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींच्या बैठकीत पाकिस्तानबाबत अवाक्षरही नाहीमेहबुबा मुफ्ती यांचे वेगळेच ‘रागरंग’पंतप्रधान मोदींचा जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा वेगळाच नूर आणि सूर पाहायला मिळाल्याचे सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या फोरमशी चर्चा करताना मुफ्ती यांनी पाकिस्तानशीही चर्चा करण्याची वकिली केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीतील या बैठकीत मुफ्ती यांनी पाकिस्तानबाबत अवाक्षर काढले नसल्याची माहिती मिळाली आहे. (pm modi meeting mehbooba mufti changed her tune on  talk to pakistan and article 370)

अनुच्छेद ३७० हटवल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कोणीही तिरंगा हातात घेणार नाही, असा दावा करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती त्याच तिरंगा ध्वजाच्या समोर बसून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. एका वृत्तपत्रानुसार, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत फुटीरतावादी आणि पाकिस्तानशी चर्चेबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी अवाक्षरही काढले नाही. मात्र, या बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये माध्यमांशी बोलताना, जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची चर्चा करत असताना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा आग्रह मेहबुबा मुफ्ती यांनी धरला होता. 

जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानही पक्षकार

आम्हाला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आमच्याकडून काढून घेतलेले आहेत. जम्मू-काश्मीरचाही मुद्दा आहेच. या पूर्ण क्षेत्रात शांतता कायम प्रस्थापित करायला हवी. ही मंडळी तालिबान्यांशी चर्चा करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसोबत चर्चा करावी. तसेच पाकिस्तानशीही बोलणी करावी. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानही पक्षकार आहे, असे मेहबुबा मुफ्ती यांनी यापूर्वी म्हटले होते. 

दरम्यान, राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. एवढेच नाही, तर, दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं, असे पंतप्रधान मोदी या बैठकीनंतर म्हणाले. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सुमारे ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी संवाद साधला. 

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकारMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान