शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:39 IST

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

नवी दिल्ली - यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

"जनतेच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार आहे पण अशा प्रकारे माझा अपमान करू नका" अशी भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.  "आम्ही 'सागर'ला पोहचलो तेव्हा आम्हाला सूचना मिळाली की आम्हाला 20 मिनिटे वाट पाहावी लागेल कारण पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी वेळ लागणार होता. पंतप्रधानांना आमच्या वेळेच्या नियोजनाची अगोदरच माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही आम्हाला त्यांची वाट पाहावी लागली. परंतु, आम्ही जेव्हा बैठकीच्या ठिकाणी पोहचलो तेव्हा बैठक सुरू झाली होती आणि पंतप्रधानही तिथं उपस्थित होते" असं ममता यांनी म्हटलं आहे.

"पंतप्रधानांना सन्मान देण्यासाठी मी मुख्य सचिवांसोबत बैठकीत पोहचले होते. मुख्य सचिवांना सोबत येण्यास मी विनंती केली कारण ते आमच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. पण, बैठकीस्थळी आम्ही पोहचल्यानंतर आम्हाला वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं. माझ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांना एका मिनिटासाठी भेटण्याची परवानगी मागितली परंतु, पंतप्रधानांच्या एसपीजीनं आम्हाला एक तास वाट पाहावी लागेल, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला काही रिकाम्या खुर्च्याही दाखवल्या. परंतु, त्यावेळी तिथं बसण्यात काहीही अर्थ नव्हता" असंही म्हटलं आहे.

"त्यानंतर जेव्हा आम्ही बैठकीत दाखल झालो तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहवाल सोपवण्यासाठी आम्हाला एक मिनिट देण्यात आला आहे. परंतु, एसपीजीकडून ही बैठक एक तास चालणार असल्याचं सांगण्यात आलं. दीघाचं वातावरण खराब असल्यानं आम्हाला तिकडे निघावं लागेल, असं आम्ही पंतप्रधानांना सांगितलं. आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे अहवाल सोपवला आणि त्यांची परवानगी घेऊनच तिथून निघालो" असंही ममता दीदींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. "भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट पाहा" असं म्हणत मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "30 उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय 15 लाख रुपयांची सात वर्षांपासून वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघावी लागत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसIndiaभारत