शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:39 IST

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

नवी दिल्ली - यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

"जनतेच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार आहे पण अशा प्रकारे माझा अपमान करू नका" अशी भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.  "आम्ही 'सागर'ला पोहचलो तेव्हा आम्हाला सूचना मिळाली की आम्हाला 20 मिनिटे वाट पाहावी लागेल कारण पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी वेळ लागणार होता. पंतप्रधानांना आमच्या वेळेच्या नियोजनाची अगोदरच माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही आम्हाला त्यांची वाट पाहावी लागली. परंतु, आम्ही जेव्हा बैठकीच्या ठिकाणी पोहचलो तेव्हा बैठक सुरू झाली होती आणि पंतप्रधानही तिथं उपस्थित होते" असं ममता यांनी म्हटलं आहे.

"पंतप्रधानांना सन्मान देण्यासाठी मी मुख्य सचिवांसोबत बैठकीत पोहचले होते. मुख्य सचिवांना सोबत येण्यास मी विनंती केली कारण ते आमच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. पण, बैठकीस्थळी आम्ही पोहचल्यानंतर आम्हाला वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं. माझ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांना एका मिनिटासाठी भेटण्याची परवानगी मागितली परंतु, पंतप्रधानांच्या एसपीजीनं आम्हाला एक तास वाट पाहावी लागेल, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला काही रिकाम्या खुर्च्याही दाखवल्या. परंतु, त्यावेळी तिथं बसण्यात काहीही अर्थ नव्हता" असंही म्हटलं आहे.

"त्यानंतर जेव्हा आम्ही बैठकीत दाखल झालो तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहवाल सोपवण्यासाठी आम्हाला एक मिनिट देण्यात आला आहे. परंतु, एसपीजीकडून ही बैठक एक तास चालणार असल्याचं सांगण्यात आलं. दीघाचं वातावरण खराब असल्यानं आम्हाला तिकडे निघावं लागेल, असं आम्ही पंतप्रधानांना सांगितलं. आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे अहवाल सोपवला आणि त्यांची परवानगी घेऊनच तिथून निघालो" असंही ममता दीदींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. "भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट पाहा" असं म्हणत मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "30 उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय 15 लाख रुपयांची सात वर्षांपासून वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघावी लागत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसIndiaभारत