शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

“भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:15 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू: अनुच्छेद रद्द करून जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा देण्यात यावा, यासाठी स्थानिक नेते आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत कोणताही फरक नाही, अशी टीका केली आहे. (pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370)

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चा करायला हवी. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू व्हायला हवा, असा सल्ला देत पाकिस्तानचे नाव काढल्यावर पंतप्रधान मोदी नाराज का होतात, अशी खोचक विचारणा केली आहे. अनुच्छेद ३७० पाकिस्तान किंवा चीनने दिलेले नाही. ते रद्द करण्याचा निर्णयाच्या फेरविचार करायला हवा, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. 

भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

भाजप ७० वर्ष संघर्ष करू शकते तर आपण का नाही?

भाजप ७० वर्ष संघर्ष करते आणि कलम ३७० बेकायदेशीर आणि असंवैधानिकपणे रद्द करते, तर आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष का करत नाही, अशी विचारणा करत मला लोकांना सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारे भारताची निवड केली, तेव्हा काश्मिरींनी तुमचे समर्थन केले तर बाकीचे पाकिस्तानात गेले. आम्ही त्यावेळी धर्माचे समर्थन केले नाही, आम्ही सरकारी सैन्याचे व बंधुत्वाचे समर्थन केले. मात्र, राज्यघटनेचा भंग करून आज भाजपने जम्मू-काश्मीरचे अस्तित्व संपवले, अशी टीकाही मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

दरम्यान, भाजप आपल्याच देशवासीयांवर संशय घेतला. इस्रायलच्या तंत्रज्ञान वापरत हेरगिरी केली, असा आरोप करत जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू, असा पुनरुच्चार मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.   

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी