शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 10:05 IST

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे.

ठळक मुद्देराजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला पहिल्यांदाच थेटपणे अजित पवारांनी उत्तर दिलेआपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही

पंढरपूर – आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे.(Ajit Pawar Target BJP Devendra Fadnavis in Pandharpur election campaigning)  

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला पहिल्यांदाच थेटपणे अजित पवारांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सभेत अजितदादांची नक्कल केली होती. त्यावरून आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर...असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. फडणवीसांनी पावसात सभा घेतलेल्याचाही अजितदादांनी समाचार घेतला. तुम्ही कुठे अन् साहेब कुठे असं सांगत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी 5 वर्षे टीकेल का?  

भाजपाने ५ वर्षे राजकारण केले, भारत भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपाने २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो, असा सांगावा फडणवीस आज करत आहेत. मात्र, मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी परतावा अद्याप दिला नाही, मग इतर मागण्यांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला

त्याचसोबत भाजपा प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत भालकेंबद्दल आदर आहे. भाजपाला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?. भाजपाकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा टोला जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला.

टॅग्स :pandharpur-acपंढरपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021