शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

UP panchayat Election: दोन वेळा खासदार, साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता आली नाही; 2100 मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 14:20 IST

UP Panchayat Election Results 2021, Reena Chaudhary: आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला.

UP Gram Panchayat Election 2021 लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत (Uttar Pradesh panchayat Election) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार रीना चौधरी (Ex MP reena chaudhary) यांना साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता न आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने पाडले आहे. (two times MP reena chaudhary lost Uttar Pradesh panchayat Election from lucknow  )

UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळलखनऊच्या जिल्हा पंचायतचे अध्यक्षपद हे एससी महिलेसाठी राखीव होते. यामुळे भाजपाने माजी खासदार असलेल्या रीना चौधरी यांना वॉर्ड नंबर १५ मधून जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिली. आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला. सपा समर्थित पलक रावतने चौधरी यांना 2100 मतांनी पराभूत केले. 

वॉर्ड नंबर १५ मधून पलक यांना 8834 मते मिळाली. तर रीना चौधरी यांना 6735 मते मिळाली. यामुळे त्यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. लखनऊ पंचायतमध्ये 25 जागा आहेत. जिंकणारे सदस्य एका व्यक्तीला जिल्हा पंचायतचा अध्यक्ष निवडतात. रीना चौधरी या मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या 1998-99 आणि 1999-2004 अशा दोनदा खासदार राहिलेल्या आहेत. 2016 मध्ये त्यांना बसपामध्ये प्रवेश केला होता. परंतू पोटनिवडणुकीत सपा-बसपा आघाडी झाल्याने त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. 

उत्तर प्रदेशच्य़ा या मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत पूर्वांचल, अवध आणि मध्ये युपीमध्ये सपाचा दबदबा पहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वारणसी आणि अयोध्येमध्ये भाजपाला कडवी हार पत्करावी लागली आहे. तर पश्चिम युपीमध्ये भाजपाला विजयासाठी झगडावे लागले आहे. तिथे जाटबहुल भागात अजीत सिंहांच्या आरएलडीने भाजपावर मात केली आहे. 

पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाMember of parliamentखासदारSamajwadi Partyसमाजवादी पार्टी