शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 08:43 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत, न्यायपालिकांमध्ये न्यायाधीशांची पदे न भरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदेशात या पदांसाठी पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीशांची कमतरता नाहीही पदे भरण्याची मोदी सरकारची इच्छाच नाही काकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी जवळपास दररोज केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदे न भरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मोदी सरकारला भाजपच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवे आहेत, असा दावाही केला आहे. (p chidambaram criticised pm modi govt about judge vacancies in high court)

“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका

गेल्या ७ वर्षांपासून उच्च न्यायालय आणि विविध न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची पदे रिक्त असल्यावरून पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भाजप आणि संघाच्या विचारांची माणसे हवी असल्याने अजूनही पदे भरली गेलेली नाहीत. उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या १०८० पदांपैकी ४१६ रिक्त आहेत. तसेच विविध न्यायाधिकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, असा मोठा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे. 

गेली ७ वर्षे पदे का भरली नाहीत?

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ७ वर्षे ही पदे रिक्तच असून त्यावर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. आपल्या देशात या पदांसाठी पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीशांची कमतरता नाही. असे असताना ही पदे भरण्याची मोदी सरकारची इच्छाच नाही का, अशी विचारणाही पी. चिदंबरम यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून अनेक सरकारी संस्था तसेच अन्य विभागांमध्ये भाजप आणि संघ विचारसरणी असलेल्या माणसांच्या नियुक्त्या केल्या जातात, असा आरोप केला जात असतो. मात्र, प्रथम याचा संबंध न्यायपालिकांमधील नियुक्त्यांबाबत जोडलेला दिसून येतो, असे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून कॉलेजियमच्या शिफारशीनंतर न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असते. कॉलेजियमने अनेकांची शिफारस करून पदे भरण्याविषयी केंद्राला सुचवले आहे. तसेच सरन्यायाधीशांनीही अनेकदा याबाबत आपली मते मांडली आहेत.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ