शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 08:43 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत, न्यायपालिकांमध्ये न्यायाधीशांची पदे न भरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदेशात या पदांसाठी पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीशांची कमतरता नाहीही पदे भरण्याची मोदी सरकारची इच्छाच नाही काकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी जवळपास दररोज केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदे न भरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मोदी सरकारला भाजपच्या विचारसरणीचे न्यायाधीश हवे आहेत, असा दावाही केला आहे. (p chidambaram criticised pm modi govt about judge vacancies in high court)

“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका

गेल्या ७ वर्षांपासून उच्च न्यायालय आणि विविध न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची पदे रिक्त असल्यावरून पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भाजप आणि संघाच्या विचारांची माणसे हवी असल्याने अजूनही पदे भरली गेलेली नाहीत. उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या १०८० पदांपैकी ४१६ रिक्त आहेत. तसेच विविध न्यायाधिकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, असा मोठा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे. 

गेली ७ वर्षे पदे का भरली नाहीत?

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ७ वर्षे ही पदे रिक्तच असून त्यावर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. आपल्या देशात या पदांसाठी पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीशांची कमतरता नाही. असे असताना ही पदे भरण्याची मोदी सरकारची इच्छाच नाही का, अशी विचारणाही पी. चिदंबरम यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून अनेक सरकारी संस्था तसेच अन्य विभागांमध्ये भाजप आणि संघ विचारसरणी असलेल्या माणसांच्या नियुक्त्या केल्या जातात, असा आरोप केला जात असतो. मात्र, प्रथम याचा संबंध न्यायपालिकांमधील नियुक्त्यांबाबत जोडलेला दिसून येतो, असे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून कॉलेजियमच्या शिफारशीनंतर न्यायाधीशांची नियुक्ती केली जात असते. कॉलेजियमने अनेकांची शिफारस करून पदे भरण्याविषयी केंद्राला सुचवले आहे. तसेच सरन्यायाधीशांनीही अनेकदा याबाबत आपली मते मांडली आहेत.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ