शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:30 IST

Adhir Ranjan Chowdhury : ट्वीटवरून वाद सुरू असतानाच काँग्रेसने मोदी सरकारला सवाल केला आहे.

नवी दिल्ली - हवामान बदलासारख्या विषयांवर काम करणारी ग्रेटा थनबर्ग ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ट्वीट करत तिने समर्थन दिलं होतं. तिच्या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर काही जणांनी तिच्या ट्वीटचा विरोध केला तर काहींनी तिच्या ट्वीटचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या ट्वीटवरून वाद सुरू असतानाच काँग्रेसने मोदी सरकारला सवाल केला आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला "18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?" असा प्रश्न विचारला आहे.

लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्रेटा थनबर्ग वरून निशाणा साधला आहे. "सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींना भरकटवलं जात आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का? की विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याबद्दल 18 वर्षीय मुलीला (ग्रेटा थनबर्ग) आपल्याकडे शत्रू मानलं जात आहे?" असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं. 

"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट 

रिहानानंतर आता स्विड‍िश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटलं होतं. ग्रेटाने पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलं गेल्याचं म्हटलं. "विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण हे दोन्ही बोलण्याचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, तथ्य आणि परदर्शकतेवर आधारित आहे. जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचाही आदर करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचा आदर करू शकणार नाही," असं ट्वीट ग्रेटा थनबर्गनं केलं आहे. यापूर्वी अभिनेते प्रकाश राज यांनी ग्रेटा थनबर्गच्या ट्वीटचं समर्थन केलं होतं. आता त्यांनी तिचं हे नवं ट्वीट लाईकदेखील केलं आहे. 

"जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव", राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव आहेत" असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्लीcongressकाँग्रेसGreta Thunbergग्रेटा थनबर्गNarendra Modiनरेंद्र मोदी