शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; "जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..."

By प्रविण मरगळे | Updated: October 20, 2020 10:16 IST

Devendra Fadanvis on Sharad Pawar News: इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.

ठळक मुद्देराज्याची कर्ज काढण्याची पत १ लाख २० हजार कोटी आहे, सध्या ५० हजार कोटींचे कर्ज राज्यावर आहेमी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर कधीही टीका केली नाही, दौरा करा अथवा करू नका, पण शेतकऱ्यांना मदत करासरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे.

उस्मानाबाद – सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे हात दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाष्य कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नकोय असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

अतिवृष्टी झालेल्या भागात त्यांनी पाहणी केली, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढचं ते बोलतात. शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.  

तसेच जीएसटीबाबत मार्चपर्यंत सर्व अनुदान केंद्राने राज्य सरकारला दिला आहे, राज्याप्रमाणे केंद्रालाही जीएसटी मिळाला नाही, केंद्र सरकार १ लाख कोटींची कर्ज घेऊन राज्याला जीएसटी नुकसान परतावा देणार आहे. तो पैसा राज्याला येणार आहे. परंतु आता राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्याची कर्ज काढण्याची पत १ लाख २० हजार कोटी आहे, सध्या ५० हजार कोटींचे कर्ज राज्यावर आहे, त्यामुळे आणखी कर्ज काढू शकतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आपत्ती परिस्थितीत अतिरिक्त व्यवस्था उभी करायला हवी, कृषी, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची यंत्रणा जे फिल्डवर काम करतात त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. वेगवेगळ्या विभागांना एकत्र केलं तर लवकर शेतकऱ्यांना मदत दिली जाऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर कधीही टीका केली नाही, पुलावरून पाहणी केली त्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. दौरा करा अथवा करू नका, पण शेतकऱ्यांना मदत करा असं सांगत राज्याला तात्काळ मदत द्यावी असं विनंती मी अमित शहांना केली आहे. मी बोललो अथवा मुख्यमंत्री बोलले तरी केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार आहे. संकटकाळात पक्षपातीपणा करत नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

आज पत्र दिले अन् उद्या रेल्वे सुरु होत नाही

आज पत्र पाठवाल, उद्या महिलांना लोकल सेवा सुरु करता येत नाही, त्यासाठी नियोजन करावं लागतं, कुठून कुठपर्यंत रेल्वे चालवायची, वेळेचे नियोजन, गर्दीचे नियोजन कसं करायचं हे सगळं राज्य सरकारने माहिती दिली तर निश्चित लोकल सेवा सुरु होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या माध्यमातून टीका

मागील सरकारच्या काळात पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती, तेव्हा सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची मदत तातडीने करावी अशी भूमिका त्यांनी घेतली होती, अजित पवारांनीही अशाप्रकारे १० हजार कोटींची मदत तोकडी आहे, ही मदत कोणाला पुरणार आहे? असं सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने व्हिडीओ दाखवत त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याची संधी आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार