शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Updated: November 7, 2020 08:49 IST

12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होतीचंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती

मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अखेर महाविकास आघाडी सरकारने बारा जणांच्या नावाची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली, सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी ४ उमेदवारांना संधी दिली, शुक्रवारी महाविकास आघाडीचे मंत्री शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी दिली.

अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती, मात्र त्यांना भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

चंद्रकांत रघुवंशी हे १९९२ पासून काँग्रेस पक्षात होते, नंदूरबार जिल्ह्यात रघुवंशी कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ मानलं जात होतं, १२ वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य होते, विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांनी तत्कालीन आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचं शिवबंधन हातावर बांधलं होतं. राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुनील शिंदे, युवासेनेचे राहुल कनाल, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर यांना अजूनही प्रतिक्षा यादीत राहावं लागणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिल्याने स्थानिक आमदार सुनील शिंदे यांना मतदारसंघ सोडावा लागला होता.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयारामांना संधी देण्यात धन्यता मानली आहे. अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांना दीड लाखांच्या आसपास मतदान झालं होतं, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभव सहन करावा लागला होता. यशपाल भिंगे हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात, भिंगेंना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा असे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे, नुकतेच भाजपाकडून धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. वनकर हे आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध गायक आहेत, काँग्रेसने राज्यपाल नियुक्त जागेसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना प्रतिक्षा यादीत कायम ठेवल्याची चर्चा आहे.   

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा