शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Updated: November 7, 2020 08:49 IST

12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होतीचंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती

मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अखेर महाविकास आघाडी सरकारने बारा जणांच्या नावाची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली, सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी ४ उमेदवारांना संधी दिली, शुक्रवारी महाविकास आघाडीचे मंत्री शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी दिली.

अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती, मात्र त्यांना भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

चंद्रकांत रघुवंशी हे १९९२ पासून काँग्रेस पक्षात होते, नंदूरबार जिल्ह्यात रघुवंशी कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ मानलं जात होतं, १२ वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य होते, विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांनी तत्कालीन आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचं शिवबंधन हातावर बांधलं होतं. राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुनील शिंदे, युवासेनेचे राहुल कनाल, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर यांना अजूनही प्रतिक्षा यादीत राहावं लागणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिल्याने स्थानिक आमदार सुनील शिंदे यांना मतदारसंघ सोडावा लागला होता.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयारामांना संधी देण्यात धन्यता मानली आहे. अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांना दीड लाखांच्या आसपास मतदान झालं होतं, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभव सहन करावा लागला होता. यशपाल भिंगे हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात, भिंगेंना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा असे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे, नुकतेच भाजपाकडून धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. वनकर हे आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध गायक आहेत, काँग्रेसने राज्यपाल नियुक्त जागेसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना प्रतिक्षा यादीत कायम ठेवल्याची चर्चा आहे.   

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा