शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 15:23 IST

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेतमेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेतृत्वाबद्दल पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीला नेतृत्वाला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात गांधी कुटुंबाचं वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भाजपा तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे, तर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत लढत आहेत. हे तेच नेते आहेत,ज्यांनी इतकी वर्ष काँग्रेस कार्यकारणी समितीवर कब्जा ठेवला आहे. काही चांगले झाले तर त्याचा उपभोग घ्यायचा आणि खराब झालं तर त्याच्यावर टीका करायची. ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्त्वावर ढासळत असलेला विश्वास काँग्रेसला कमकुवत करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व कंबर कसून तयार होत नाही, तोपर्यंत खालच्या स्तरात कमकुवत शक्ती आणि कोंडी कायम राहणार आहे. यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत, मेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, चमत्कार नक्कीच घडेल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. यामुळेच देशाचे भले झाले असून पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

गुलाब नबी आझादांची टीका

नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.

 कपिल सिब्बलही नाराज

राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या असं सांगत कपिल सिब्बल यांनीही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपमkapil sibalकपिल सिब्बलElectionनिवडणूक