शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 15:23 IST

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेतमेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेतृत्वाबद्दल पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीला नेतृत्वाला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात गांधी कुटुंबाचं वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भाजपा तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे, तर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत लढत आहेत. हे तेच नेते आहेत,ज्यांनी इतकी वर्ष काँग्रेस कार्यकारणी समितीवर कब्जा ठेवला आहे. काही चांगले झाले तर त्याचा उपभोग घ्यायचा आणि खराब झालं तर त्याच्यावर टीका करायची. ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्त्वावर ढासळत असलेला विश्वास काँग्रेसला कमकुवत करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व कंबर कसून तयार होत नाही, तोपर्यंत खालच्या स्तरात कमकुवत शक्ती आणि कोंडी कायम राहणार आहे. यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत, मेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, चमत्कार नक्कीच घडेल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. यामुळेच देशाचे भले झाले असून पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

गुलाब नबी आझादांची टीका

नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.

 कपिल सिब्बलही नाराज

राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या असं सांगत कपिल सिब्बल यांनीही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपमkapil sibalकपिल सिब्बलElectionनिवडणूक