शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 15:23 IST

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेतमेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेतृत्वाबद्दल पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीला नेतृत्वाला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात गांधी कुटुंबाचं वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भाजपा तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे, तर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत लढत आहेत. हे तेच नेते आहेत,ज्यांनी इतकी वर्ष काँग्रेस कार्यकारणी समितीवर कब्जा ठेवला आहे. काही चांगले झाले तर त्याचा उपभोग घ्यायचा आणि खराब झालं तर त्याच्यावर टीका करायची. ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्त्वावर ढासळत असलेला विश्वास काँग्रेसला कमकुवत करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व कंबर कसून तयार होत नाही, तोपर्यंत खालच्या स्तरात कमकुवत शक्ती आणि कोंडी कायम राहणार आहे. यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत, मेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, चमत्कार नक्कीच घडेल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. यामुळेच देशाचे भले झाले असून पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

गुलाब नबी आझादांची टीका

नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.

 कपिल सिब्बलही नाराज

राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या असं सांगत कपिल सिब्बल यांनीही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपमkapil sibalकपिल सिब्बलElectionनिवडणूक